Sunday, June 28, 2026
Homeगडचिरोली'उपजीविका विकास' प्रकल्पाला हातभार; दुर्गम भागातील १ हजार ५०० कुटुंबांना मिळणार शाश्वत...

‘उपजीविका विकास’ प्रकल्पाला हातभार; दुर्गम भागातील १ हजार ५०० कुटुंबांना मिळणार शाश्वत आधार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील एटापल्ली तालुक्यात महत्त्वाकांक्षी ‘एकात्मिक उपजीविका विकास’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.बायफ(BAIF)डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला हा प्रकल्प एसबीआय फाउंडेशनने पुरस्कृत केला आहे.१ एप्रिल २०२५ पासून ३ वर्षांसाठी सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी ₹४.९५ कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे.एटापल्ली तालुक्यातील २० गावांना लक्ष्य करून,सुमारे १ हजार ५०० कुटुंबांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचे मुख्य उद्दिष्ट या प्रकल्पाचे आहे.हवामान-अनुकूल शेतीला प्रोत्साहन देणे,उपजीविका सुधारणे आणि निवडक गावांमधील समुदायाची समृद्धी वाढवणे,हे या उपक्रमाचे मूळ केंद्र आहे.या प्रकल्पात चालू वर्षासाठी ५०० कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली आहे.यासोबतच, जलसंधारण वाढवण्यासाठी १५ बोडींमधील(नैसर्गिक शेततळी) गाळ काढण्याचे कामही यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.या प्रकल्पात ‘नैसर्गिक शेततळी-आधारित शेती प्रणाली’ या अभिनव संकल्पनेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.ही प्रणाली एकात्मिक दृष्टिकोन वापरते,जिथे शेततळीत मासेपालन केले जाते,शेततळ्याच्या वर कुक्कुटपालन करून कोंबड्यांचे खत माशांसाठी नैसर्गिक खाद्य म्हणून वापरले जाते आणि त्याच पाण्याचा उपयोग नजीकच्या पिकांना सिंचनासाठी केला जातो.हा मॉडेल पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करतो आणि कृषी उत्पादकता वाढवून ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत उपलब्ध करतो. २०२७-२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर,१ हजार ५०० कुटुंबांना शाश्वत आर्थिक आधार मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर दोघांचा बळी घेणारी नरभक्षक वाघिण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात दोघांचा बळी घेणारी व दोघांना जखमी करणारी टी-२७ नरभक्षक वाघीण जेरबंद करण्यास वनविभागास यश आले आहे.आज,रविवार २८...

गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ७७ हजार ६६६ चिमुकल्यांना पोलिओचा डोस..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात आज रविवारी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय 'पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला' नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पहिल्याच...

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-भरधाव वेगात असलेली अनियंत्रित वॅगनर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरच्या मागील बाजूस जोरदार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील...

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; आरमोरी शहरातील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहरात एका ६५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, रविवार २८ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!