Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीई-केवायसी न केल्यास राशन होणार बंद..! - गडचिरोली जिल्ह्यात ३ लाखाच्या वर...

ई-केवायसी न केल्यास राशन होणार बंद..! – गडचिरोली जिल्ह्यात ३ लाखाच्या वर सदस्यांची ई-केवायसी प्रलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शासनाच्या आदेशानुसार सर्व अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या सर्व शिधापत्रीकाधारकांनी आपल्या शिधापत्रीकेमधील सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे आवश्यक आहे.यासाठी विशेष मोहीम सुरु असुन,येत्या २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ई केवायसी न केल्यास,धान्य मिळणार नाही.यासाठी सर्व शिधापत्रीकाधारकांनी रास्तभाव दुकानात जावून ई-केवायसी करावी,असे आवाहन गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी केले आहे. तसेच नो नेटवर्क झोनमधील गावाकरीता,नेटवर्क असलेल्या ठिकाणी विशेष कॅम्प आयोजीत करुन ई-केवायसी करुन घेण्याबाबत तहसिलदार यांना आदेश देण्यात आले आहेत.
ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी रास्तभाव दुकाने पुर्णवेळ सुरु ठेवावी.जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून प्रत्येक महिण्यातील १ तारखेपर्यंत जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानात,लाभार्थ्यांकरीता धान्य उपलब्ध करुन देण्यात येते.प्रत्येक महिण्याच्या ७ तारखेला अन्नदिवस साजरा केला जातो,त्या दिवसापर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी धान्याची उचल करावी.तसेच ७ ते १५ तारखेपर्यंत अन्न सप्ताह साजरा केल्या जातो.त्यामुळे १५ तारखेपर्यंत रास्तभाव धान्य दुकानामधुन १०० टक्के लाभार्थ्यांनी धान्याची उचल करावी,असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या गटातील शिधापत्रीकाधारकांना मोफत रेशनधान्य देण्यात येते,यासाठी सर्व लाभार्थ्यांची आधारशी निगडीत ई केवायसी रास्तभाव धान्य दुकानात होणे बंधनकारक आहे.’वन नेशन वन रेशन’ उपक्रमात देशभरात ज्या ठिकाणी लाभार्थी धान्य घेत आहेत.त्याच दुकानात त्यांची ई-केवायसी होणे अनिवार्य आहे.गडचिरोली जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या एकुण २२३९०५ शिधापत्रीका असुन ८४१८५१ सदस्य आहेत.त्यापैकी ५२१७१५ सदस्यांची इ-केवायसी पूर्ण झाली आहे.उर्वरीत ३२०१३६ शिधापत्रीकेतील सदस्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे.त्यामुळे प्रलंबित असलेल्या सदस्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी; अन्यथा राशन मिळणे बंद होणार आहे.
नोंदणीकृत स्थलांतरीत व असंघठीत कामगारांना ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीनुसार रेशन कार्ड वितरीत करण्यात येणार आहे.ज्या कामगारांकडे अजुनही रेशनकार्ड नाही,त्यांनी तातडीने तहसील कार्यालयामध्ये अर्ज करावा,त्यांना तातडीने रेशनकार्ड वितरीत करण्यात येईल,असे गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!