- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार ३ मार्च पासून सुरू झाले आहे.सदरचे अधिवेशन हे ३ मार्च ते २६ मार्च २०२५ पर्यंत असणार आहे.१० मार्च रोजी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.अशातच यंदाचे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतांनाच आज,५ मार्चला समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधानसभेत सादर केला.त्यानंतर सदर प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.अबू आझमींना निलंबित करावे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी सत्ताधारी नेत्यांकडून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल मंगळवारी करण्यात आली होती. यानंतर आज बुधवारीही त्याच मुद्द्यावरुन सभागृहात मोठा गोंधळ झाला आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला गेला.मोगल बादशहा औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता.त्याच्यात व छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती.उलट त्याच्याच काळात भारताला सोन्याची खाण म्हणून संबोधले जात होते,असा वादग्रस्त दावा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला आहे.त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेत एकमताने अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
- Advertisement -

