Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीआता होमगार्ड बंधूंचे रोजगारासाठी इतरत्र भटकणे होणार बंद.. - वर्षातून इतके दिवस...

आता होमगार्ड बंधूंचे रोजगारासाठी इतरत्र भटकणे होणार बंद.. – वर्षातून इतके दिवस मिळणार काम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-बंदोबस्तात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य पार पाडण्यात होमगार्ड हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावित असतात. त्यामुळे पोलिस खात्यात होमगार्डला विशेष महत्व आहे.मात्र, होमगार्डला काम मिळेनासे झाल्याने त्यांना प्रपंच चालविण्यासाठी मिळेल ते काम करावे लागत आहे. यावर उपाययोजना करीत राज्य शासनाने होमगार्डसाठी ६ महिने रोजगार देण्याची घोषणा केली असून,त्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद केली आहे.

जिल्ह्यात पोलिस दलासोबत कार्यरत असलेल्या होमगार्डना अत्यल्प मानधन दिल्या जाते.यातही नियमित काम मिळत नसल्याने त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे.सदर कामावर भागत नसल्याने कधी रिक्षा तर कधी बांधकामावरही होमगार्ड राबत आले आहेत. गृहरक्षक दलातील जवानांची ही दयनीय अवस्था लक्षात घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमगार्ड जवानांना वर्षातून किमान १८० दिवस काम देण्याची घोषणा केली होती.त्यानुसार वर्षातून किमान ६ महिने गृहरक्षकांना काम मिळणार आहे.यामुळे गृहरक्षक दलातील जवानांना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागणार नाही; अशी अपेक्षा आहे.
अल्प मानधनामुळे बचत नाहीच होमगार्डला प्रतिदिवस ६८० रुपये मजूरी दिली जाते.वाढत्या महागाईच्या तुलनेत रक्कम अतिशय कमी आहे. त्यामुळे मजूरी वाढविण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा ईपीएफ जमा होत नसल्याने आधीच अल्प मानधन असलेल्या होमगार्डना बचत करता येत नाही.शासनामार्फत नियुक्ती होऊन ईपीएफ जमा होत नसल्याने कर्मचाऱ्यांची भविष्यासाठी एक पैसाही बचत राहत नाही.त्यामुळे शासनाने ईपीएफ जमा करावा; अशीही मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!