उद्रेक न्युज वृत्त :-सध्याचे युग हे स्पर्धेसह तंत्रज्ञानाचे युग आहे.त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर होणे अत्यंत गरजेचे झाले आहे.गेल्या काही वर्षांमध्ये वाघांचे प्रमाण वाढल्याने वाघ शिकारीच्या शोधात मानवी वस्तीकडे येऊ लागलेत.त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढून अनेकांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमवावे लागले आहे. यासाठी राज्यात वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर उपाय म्हणून व्याघ्र प्रकल्पांमध्ये एआय (AI)बेस तंत्रज्ञयुक्त आधारित ९०० कॅमेरे बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.ताडोबापासून ते नवेगाव बांध पर्यंत सर्वच जंगल परिसरात हे कॅमेरे असणार आहेत. एखादा वाघ किंवा बिबट्या गावाकडे किंवा खाजगी जागेत दिसेल तेव्हा हे कॅमेरे त्यांना डिटेक्ट करतील आणि तात्काळ गावातील आलाराम वाजेल.ही टेक्नॉलॉजी लोकांचा जीव वाचवण्याकरिता आहे.हे तंत्रज्ञान जंगलात वापरले गेले तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळणार आहे,असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत मार्वल कंपनीसोबत सरकारचा करार करण्यात आला आहे.
आता वाघ आल्याची माहिती देणार एआय बेस कॅमेरे..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

