- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज,शुक्रवार ६ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे.राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आहे; अशा पात्र शेतकऱ्यांना “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” अंतर्गत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल.तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात,त्यांच्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.त्याचबरोबर,आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात, गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा सहभाग, पाणंद रस्त्यांना मान्यता,गोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचाही समावेश करणार,महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल.तसेच चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.
- Advertisement -

