Monday, August 24, 2026
Homeनागपूरअन् मृत्यूनंतर सुटला निर्दोष; तीन हजाराची घेतली होती लाच....

अन् मृत्यूनंतर सुटला निर्दोष; तीन हजाराची घेतली होती लाच….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- लाचलुचपत प्रकरणात आरोपी असणारे एक सहकार अधिकारी मृत्यूनंतर निर्दोष ठरले.संबंधित अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी यासंदर्भातील न्यायालयीन लढा लढला.

बाबाराव श्यामराव विटाळकर असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून ते सावनेर येथे सहायक उपनिबंधक (सहकारी संस्था) होते.त्यांनी सावकारीचे लायसन्स देण्यासाठी तीन हजार रुपये मागितले; अशी तक्रार पवन जयस्वाल यांनी २५ जुलै १९९४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून विटाळकर यांच्याविरुद्ध सापळा रचून कारवाई करण्यात आली होती.त्यानंतर २८ फेब्रुवारी २००५ रोजी विशेष सत्र न्यायालयाने विटाळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. तसेच एकूण तीन हजार रुपये दंड ठोठावला.त्या निर्णयाविरुद्ध विटाळकर यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.ते अपील प्रलंबित असताना विटाळकर यांचा मृत्यू झाला.परिणामी त्यांच्या वारसदारांनी ते अपील पुढे चालविले.उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी अंतिम सुनावणीनंतर विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता ते अपील मंजूर करून विटाळकर यांना निर्दोष ठरविले व सत्र न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द केला. अपीलकर्त्यातर्फे वरिष्ठ ॲड.अविनाश गुप्ता यांनी कामकाज पाहिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!