Monday, April 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत होणार वाढ.. - संजय सरोवर धरणाचे तीन...

सावधान..! वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत होणार वाढ.. – संजय सरोवर धरणाचे तीन दरवाजे खुले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत पावसाने विश्रांती घेतल्यासारखी स्थिती आहे.यापूर्वी राज्यासह विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावत सगळीकडे पाणीच पाणी होऊन वैनगंगा नदीची सामान्य पाणी पातळी राखण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले होते.त्यामुळे वैनगंगा नदीला पूर येऊन हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान झाले होते.अश्यातच आता मध्य प्रदेशात धो- धो पाऊस बरसत असल्याने पूर सदृश परिस्थिती लक्षात घेता आज,बुधवार १६ जुलै संजय सरोवर धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे.विशेष म्हणजे,संजय सरोवर धरण हे मध्य प्रदेशाच्या सिवनी जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर बांधण्यात आले असून आशिया खंडातील सर्वात मोठा धरण आहे.संजय सरोवर धरणाचे पाणी वैनगंगा नदीला येत असल्याने तसेच धरणातून सुमारे २० हजार ५०६ क्युमेक पाणी सोडण्यात येणार असल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.त्यानुसार नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या कारधा येथील वैनगंगा नदीची पाणी पातळी २४२.२२ मीटर आहे.त्याच वेळी, धोक्याची पाणी पातळी २४५.५० मीटर आहे.मध्य प्रदेशात पाऊस सुरू झाला आहे.नद्या आणि नाल्यांची पाणी पातळी वेगाने वाढत आहे.त्यामुळे संजय सरोवर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे येत्या काही दिवसांत वैनगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढू शकते. सध्या गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे उघडून ७२६ क्युमेक पाणी सोडण्यात येत आहे.त्याचप्रमाणे धापेवाडा बॅरेजचे सात दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत. अश्यातच आता पाऊस पडला तर वैनगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढेल आणि परत मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

शासन निर्णयात जरी पोपट पक्षीचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही.. – आता पोपट पक्षांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्याने शेतात डाळिंबाची झाडे लावली.पण,अर्ध्याहून अधिकच्या झाडांची फळे ही पोपट पक्षांनी खाऊन नष्ट केली होती.अश्यातच शेतकऱ्याने कृषी विभागास माहिती देऊन पंचनामा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!