Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीसर्व यात्रा सुरक्षित संपन्न; नदीपात्रातील संभाव्य जिवितहानी टाळण्यात यश.. - चार युवकांचे...

सर्व यात्रा सुरक्षित संपन्न; नदीपात्रातील संभाव्य जिवितहानी टाळण्यात यश.. – चार युवकांचे प्राण वाचवले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हाधिकारी अव‍िश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोलीमार्फत महाशिवरात्री निमित्त आयोजित यात्रांमध्ये प्रभावी आपत्ती व्यवस्थापन राबविण्यात आले.मौजा-मार्कंडा(ता.चामोर्शी),मौजा-चपराळा (ता.चामोर्शी)तसेच मौजा-पळसगाव (ता.आरमोरी)येथे १५ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या यात्रांचा कालावधी २५ फेब्रुवारी पर्यंत यशस्वीपणे पार पडला.विशेषतः मार्कंडा येथील यात्रेदरम्यान वैनगंगा नदीपात्रात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.राज्य आपत्ती प्रतिसाद दल(एसडीआरएफ)नागपूर येथील २० जवानांचे पथक,अग्निशमन विभाग,पोलीस विभागाचे बचाव पथक,बोट व आवश्यक बचाव साहित्य तसेच आपदा-मित्र यांचे पथक यात्रा कालावधीत तैनात करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी यात्रा पूर्वतयारीसंदर्भात वेळोवेळी बैठका घेऊन सर्व संबंधित विभागांना स्पष्ट दिशानिर्देश दिले.महसूल, पोलीस,जिल्हा परिषद व इतर संबंधित विभागांनी समन्वयाने काम करत यात्रा सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले.
आपत्ती व्यवस्थापनाच्या तत्परतेमुळे नदीपात्रातील संभाव्य जिवितहानी टाळण्यात यश आले.१८ फेब्रुवारी रोजी आपदा मित्र मनोज आत्राम व एसडीआरएफ जवान जी.डी.सांगळे यांनी नदीत बुडत असलेल्या एका युवकाचे प्राण वाचविले.तसेच  २२ फेब्रुवारी रोजी तीन युवक नदीपात्रात बुडाल्याची घटना घडताच आपदा मित्र समीर शेंडे,पोलीस बचाव पथकातील बाबा वासनिक व गोपाळ आलाम यांनी तात्काळ बोट व लाईफ जॅकेटच्या सहाय्याने नदीत उतरून तिन्ही युवकांना सुरक्षित बाहेर काढले.या कालावधीत जिल्ह्यातील सर्व यात्रा सुरक्षितरित्या पार पडल्या असून कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही.जिवितहानी टाळण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची व आपदा मित्रांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
सदर यात्रांचे आपत्ती व्यवस्थापन नियोजन उपविभागीय अधिकारी चामोर्शी एम.अरुण व उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तहसिलदार प्रशांत घोरुडे,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,पोलीस निरीक्षक दीपक डोंब,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे,सहाय्यक महसूल अधिकारी (आपत्ती व्यवस्थापन) स्वप्नील माटे तसेच आपदा मित्र चंद्रशेखर मोलंगुलवार, अजित नरोटे,कल्पक चौधरी व मयुर किन्नाके यांच्या सहकार्याने यात्रा आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!