Tuesday, April 21, 2026
Homeसोलापूरशेतकऱ्याने विकला ५१२ किलो कांदा; चक्क व्यापाऱ्याने चेक दिला केवळ २ रुपयांचा....-...

शेतकऱ्याने विकला ५१२ किलो कांदा; चक्क व्यापाऱ्याने चेक दिला केवळ २ रुपयांचा….- शेतकरी बांधवांची चालवली थट्टा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

सोलापूर :- शेतकऱ्याने ५१२ किलो कांदा विकल्यानंतर त्याला व्यापाऱ्याने फक्त दोन रुपयांचा चेक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.सोलापुरात हा प्रकार घडला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही बाब समोर आणली आहे.व्यापाऱ्याने शेतकऱ्याला फक्त दोन रुपयांचा चेक दिला नाही; तर पुढील १५ दिवसानंतर तो वठणार असे सांगितल्याने राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.असल्या प्रकाराबद्दल राज्यकर्त्यांनी जरा तरी लाज बाळगावी असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.

राजेंद्र तुकाराम चव्हाण असे शेतकऱ्याचे नाव असून त्याने १० पोती कांदा विकला होता.५०० किलो कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती ५१२ रुपये येणे अपेक्षित होते.मात्र ५०९ रुपयांचा खर्च वजा करून त्याच्या हाती फक्त दोन रुपये आले आहेत.या दोन रुपयांसाठीही व्यापाऱ्याने शेतकऱ्याला चक्क चेक दिला आणि १५ दिवसांनी वठेल असे सांगितले. शेतकऱ्याची ही क्रूर थट्टा सुरु असल्याचा संताप राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

दिव्यांगांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करुन एकाच छताखाली विविध शासकिय योजनांचा लाभ घ्यावा.. -देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण, पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी स्वतंत्रपणे कार्य करण्याच्या उद्देशाने दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना १५ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली.स्वतंत्र विभाग स्थापन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!