Tuesday, March 25, 2025
Homeसोलापूरशेतकऱ्याने विकला ५१२ किलो कांदा; चक्क व्यापाऱ्याने चेक दिला केवळ २ रुपयांचा....-...
spot_img

शेतकऱ्याने विकला ५१२ किलो कांदा; चक्क व्यापाऱ्याने चेक दिला केवळ २ रुपयांचा….- शेतकरी बांधवांची चालवली थट्टा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

सोलापूर :- शेतकऱ्याने ५१२ किलो कांदा विकल्यानंतर त्याला व्यापाऱ्याने फक्त दोन रुपयांचा चेक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.सोलापुरात हा प्रकार घडला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही बाब समोर आणली आहे.व्यापाऱ्याने शेतकऱ्याला फक्त दोन रुपयांचा चेक दिला नाही; तर पुढील १५ दिवसानंतर तो वठणार असे सांगितल्याने राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.असल्या प्रकाराबद्दल राज्यकर्त्यांनी जरा तरी लाज बाळगावी असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.

राजेंद्र तुकाराम चव्हाण असे शेतकऱ्याचे नाव असून त्याने १० पोती कांदा विकला होता.५०० किलो कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती ५१२ रुपये येणे अपेक्षित होते.मात्र ५०९ रुपयांचा खर्च वजा करून त्याच्या हाती फक्त दोन रुपये आले आहेत.या दोन रुपयांसाठीही व्यापाऱ्याने शेतकऱ्याला चक्क चेक दिला आणि १५ दिवसांनी वठेल असे सांगितले. शेतकऱ्याची ही क्रूर थट्टा सुरु असल्याचा संताप राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेती तस्करांच्या मागे धावला वाघ; ट्रॅक्टरच्या ट्रालीत उडी घेतल्याने थोडक्यात बचावले मजूर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :- 'रेती चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला' अश्या कथानक रेती तस्कर रंगवू लागले आहेत.रात्र असो की दिवस,चोरांसाठी सारखेच असतात. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या...

खासदारांचे वेतन वाढ; २४ टक्के वाढ झाल्याने आता महिन्याकाठी ‘इतका’ मिळणार पगार..

उद्रेक न्युज वृत्त :-संसदीय कामकाज मंत्रालयाने आज,सोमवारी २४ मार्च रोजी अधिसूचना जारी करीत खासदारांच्या वेतनात २४ टक्के वाढ केली आहे.सदरचे वाढीव वेतन हे १...

पेट्रोलियम ऑईल कंपनीमध्ये आगीचा भडका..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीत(MIDC) आज,सोमवार २४ मार्चला दुपारच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच खळबळ माजली.उन कडक असल्याने आगीने रौद्ररूप...

गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा शक्ती स्थापना व समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न… -सध्याची जनसुनावणी ही लोकशाहीला हरताळ फासणारी -प्रा.अनिल होळी

उद्रेक न्युज वृत्त  विशेष प्रतिनिधी/प्रियंका ठाकरे गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी येथे काल,रविवार २३ मार्चला ‘गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा’ स्थापना आणि समाजप्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!