Saturday, March 15, 2025
Homeगडचिरोलीशहरी भागात माणसे तर ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?- घरकुल योजनेच्या...
spot_img

शहरी भागात माणसे तर ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?- घरकुल योजनेच्या अनुदानात भेदभाव कां? नागरिकांचा रोष..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

सत्यवान रामटेके (संपादक)

गडचिरोली :- घरकूल योजनेसाठी शासनातर्फे शहरी भागासाठी २ लाख ५० हजार रुपये अनुदान दिले जाते.तर ग्रामीण भागासाठी १ लाख ३० हजार रुपये अनुदान दिले जात आहे.ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांची तुटपुंज्या अनुदाना अभावी थोडी-थोडी बांधकामे करून कितीतरी वर्षे बांधकामे पूर्ण करावी लागत असल्याने ग्रामीण व शहरी असा भेदभाव कां? शहरी भागात माणसे तर ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?असा सवाल ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थी नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

सध्याच्या घडीला बांधकाम साहित्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.जसे,रेती,सिमेंट,लोहा,गीट्टी,विटा व इतर साहित्यांचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.अशातच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना अल्पशा अनुदानात घरकूल बांधणे अवघड जात आहे.त्यामुळे काहीजण पैस्याअभावी सुरुवाती पासून अंथरूण पांघरूण पाय पसरवीत असल्याचे दिसून येत आहेत.’थेंबे थेंबे तळे साचे’ असे करतांना अनेक लाभार्थी दिसून येतात.मात्र अशाही स्थितीत लोकप्रतिनिधी चुप्पी साधून पोकळ बाता करण्याचे काम सुरू असल्याचे जनतेतून म्हटले जात आहे.

घरकुलाचे साहित्य घेतांना शहरी व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना दर सारखेच लागत असतात.उलट ग्रामीण भागातील जनतेला शहरातून घरकुलाचे साहित्य आणावे लागत असल्यामुळे अधिकचे पैसे मोजावे लागत असतात.मात्र शासनाला याची जाण आहे की नाही? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.१ लाख ३० हजारामध्ये स्वतःसाठी शासनानेच घर बांधून दाखवावे असे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनी म्हटले आहे.शासकीय बांधकामात ज्याठिकाणी २ लाखाचे काम असते; त्याठिकाणी ५ लाखाचे काम केले जाते.तर मग ग्रामीण व शहरी असा भेदभाव कां? त्यासाठी सरसकट ग्रामीण व शहरी भागासाठी २ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे; अशी मागणी सर्वच स्तरातील घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!