Sunday, May 17, 2026
Homeगडचिरोलीशहरी भागात माणसे तर ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?- घरकुल योजनेच्या...

शहरी भागात माणसे तर ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?- घरकुल योजनेच्या अनुदानात भेदभाव कां? नागरिकांचा रोष..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

सत्यवान रामटेके (संपादक)

गडचिरोली :- घरकूल योजनेसाठी शासनातर्फे शहरी भागासाठी २ लाख ५० हजार रुपये अनुदान दिले जाते.तर ग्रामीण भागासाठी १ लाख ३० हजार रुपये अनुदान दिले जात आहे.ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांची तुटपुंज्या अनुदाना अभावी थोडी-थोडी बांधकामे करून कितीतरी वर्षे बांधकामे पूर्ण करावी लागत असल्याने ग्रामीण व शहरी असा भेदभाव कां? शहरी भागात माणसे तर ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?असा सवाल ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थी नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

सध्याच्या घडीला बांधकाम साहित्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.जसे,रेती,सिमेंट,लोहा,गीट्टी,विटा व इतर साहित्यांचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.अशातच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना अल्पशा अनुदानात घरकूल बांधणे अवघड जात आहे.त्यामुळे काहीजण पैस्याअभावी सुरुवाती पासून अंथरूण पांघरूण पाय पसरवीत असल्याचे दिसून येत आहेत.’थेंबे थेंबे तळे साचे’ असे करतांना अनेक लाभार्थी दिसून येतात.मात्र अशाही स्थितीत लोकप्रतिनिधी चुप्पी साधून पोकळ बाता करण्याचे काम सुरू असल्याचे जनतेतून म्हटले जात आहे.

घरकुलाचे साहित्य घेतांना शहरी व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना दर सारखेच लागत असतात.उलट ग्रामीण भागातील जनतेला शहरातून घरकुलाचे साहित्य आणावे लागत असल्यामुळे अधिकचे पैसे मोजावे लागत असतात.मात्र शासनाला याची जाण आहे की नाही? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.१ लाख ३० हजारामध्ये स्वतःसाठी शासनानेच घर बांधून दाखवावे असे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनी म्हटले आहे.शासकीय बांधकामात ज्याठिकाणी २ लाखाचे काम असते; त्याठिकाणी ५ लाखाचे काम केले जाते.तर मग ग्रामीण व शहरी असा भेदभाव कां? त्यासाठी सरसकट ग्रामीण व शहरी भागासाठी २ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे; अशी मागणी सर्वच स्तरातील घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार...

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!