- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पाकिस्तान सुधरण्याचे नाव घेत नसल्याने भारताकडून दे धक्के सुरू आहेत.अश्यात आता भारताने चिनाब नदीवर बांधलेल्या रियासी येथील सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडले.या धरणातून आतापर्यंत पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्यात आले होते.सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले होते.आता पुन्हा सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.भारताने सलाल आणि बगलिहार धरणातून पाणी सोडल्याने पाकिस्तानात महापूराचे संकट निर्माण झाले आहे.जोरदार पावसामुळे भारताने रामवन येथील बगलिहार धरणाचा एक दरवाजा उघडला आहे.भारताने स्पष्ट केले की सिंधू जल करार स्थगित झालेला आहे.त्यामुळे आता या धरणांमधून किती पाणी सोडायचे हा निर्णय भारताच्या हातात आहे.भारतानं यापूर्वी चिनाब नदीतील पाणी रोखले होते.आता दरवाजा उघडल्याने पाणी पाकिस्तानात पोहोचेल.पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला करून निष्पाप पर्यटकांचे बळी घेतले होते. त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारत सरकारने सिंधू जल करार स्थगित केला होता आणि सिंधू नदीचे पाणी रोखले होते.यानंतर पाकिस्तानने थयथयाट करत भारताने आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन केले असल्याचा कांगावा केला होता; पण त्याला भारत सरकारने केराची टोपली दाखवली होती आणि दहशतवादाची कदापि गय केली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते.पाणी सोडताच नदी परिसरात वाळू उपश्यासाठी ठेवण्यात आलेले साहित्य वाहून जातांनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओ👇
- Advertisement -