Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीवेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचवायचा असेल तर लोकअदालतीचा घ्या लाभ..

वेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचवायचा असेल तर लोकअदालतीचा घ्या लाभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-प्रलंबित प्रकरणांच्या जलद व सामोपचाराने निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांच्या वतीने येत्या, शनिवार ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.ही लोकअदालत गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असून नागरिकांसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
या लोकअदालतीमध्ये दिवाणी,तडजोडपात्र फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई दावे,कौटुंबिक वाद (घटस्फोट वगळून),भूसंपादन प्रकरणे,बँकांची कर्ज वसुली प्रकरणे तसेच वीज देयके व पाणीपट्टी वाद आणि धनादेश अनादर(कलम १३८)यांसारखी विविध प्रकरणे सामोपचाराने निकाली काढली जाणार आहेत.याशिवाय न्यायालयात अद्याप दाखल न झालेली परंतु वादग्रस्त असलेली प्रकरणेही लोकअदालतीच्या माध्यमातून सोडविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकअदालतीत दिलेला निकाल अंतिम स्वरूपाचा असून त्याविरुद्ध अपील करता येत नाही.त्यामुळे दोन्ही पक्षांना तत्काळ व समाधानकारक न्याय मिळतो.यामधून वेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचतो तसेच आपसी वादातून निर्माण झालेली कटुता कमी होऊन संबंध सुधारण्यासही मदत होते.विशेष म्हणजे, लोकअदालतीत तडजोड झाल्यास संबंधितांनी भरलेली न्यायालयीन फी नियमानुसार परत मिळते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिक,पक्षकार तसेच वकील बांधवांना आवाहन केले आहे की,त्यांनी आपल्या प्रलंबित किंवा वादग्रस्त प्रकरणांमध्ये सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.अधिकाधिक प्रकरणे निकाली काढून न्यायप्रक्रिया सुलभ व परिणामकारक करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन अधिक्षक,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!