Saturday, June 13, 2026
Homeमुंबईविश्वचषकावर देशाचे नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित..

विश्वचषकावर देशाचे नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-देशाची आण,बाण आणि शान असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये काल रविवारी खेळल्या गेलेल्या यंदाच्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत न्यूझिलंड संघाचा पराभव करून तब्बल ९६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.भारतीय संघाने या विजयासह तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश बनला आहे. एवढेच नाही तर सलग दुसऱ्यांदा ही कामगिरी करणारा पहिला देशही भारत बनला आहे. त्यामुळे,भारतीय क्रिकेट संघाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याने आज,सोमवार ९ मार्च रोजी राज्य विधिमंडळात ट्वेंटी-२० विश्वचषकावर देशाचे नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव सादर करतांना भारताच्या विजयात मोलाचे योगदान करणाऱ्या सर्वच खेळाडूंचे कौतुक केले.या विजयामुळे टी-२० विश्वचषकावर तिसऱ्यांदा आपले नाव कोरणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे,असे ते म्हणालेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदाचा प्रस्ताव मांडला.ते म्हणाले,आज सभागृहात भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करतांना मला अतिशय आनंद वाटत आहे. अभिमान वाटत आहे.कर्णधार सूर्यकुमार यादव हे आपल्या मुंबईचे आहेत.शिवम दुबेही मुंबईचे आहेत. मुंबईने अनेक महान खेळाडू भारताला दिलेत.आज आपल्या गावातील सामान्य खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत.यातील अनेक खेळाडू अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेत.ते आज खेळाचे व देशाचे नाव मोठे करत आहेत.मी या सभागृहाच्या वतीने अभिनंदनाचा प्रस्ताव पास करून त्याची एक प्रत ही आपल्या भारतीय संघाला पाठवावी अशी विनंती करतो आहे;असे ते म्हणाले.त्यानंतर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव सर्वानुमते पारित झाल्याचे घोषित करून त्याची प्रत संबंधितांना पाठवण्याचे आदेश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!