Wednesday, June 10, 2026
Homeऔरंगाबाद विद्यार्थ्यांना साडे दहा नंतर परीक्षा केंद्रात 'नो एंट्री'- पेपर फुटीला बसणार चाप

 विद्यार्थ्यांना साडे दहा नंतर परीक्षा केंद्रात ‘नो एंट्री’- पेपर फुटीला बसणार चाप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) :- दहावी व बारावीच्या परीक्षा सध्या सुरू असुन परीक्षेदरम्यान होणारी पेपरफुटी टाळण्यासाठी आता विद्यार्थ्यांना परीक्षेला ३० मिनिटेआधीच प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर प्रवेशास बंदी घालण्यात आली असल्याचे सुचनापत्र बाेर्डाने जारी केले आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावी व बारावीची परीक्षा सध्या सुरू आहे.बारावीच्या परीक्षेत शुक्रवारी ३ मार्च रोजी गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याचे समोर आल्याने सदर प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर व्हायरल झाली आहेत.त्यामुळे मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दुपरी २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. त्यावेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यांस परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही,असे मंडळाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सदर गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. तसेच संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस स्टेशनला फिर्याद क्र.००३७ अन्वये अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत.त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही याची विद्यार्थी,शिक्षक,पालक व सर्व संबंधीत घटकांनी नोंद घ्यावी,असेही पत्रात म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!