Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवादळी वाऱ्यासह बरसणार पाऊस; तब्बल बारा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा..

वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊस; तब्बल बारा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पावसाचा जोर कमी झाला असला तरीही राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागात मोठा पाऊस पडल्याने नदी,नाले दुथडी भरुन वाहू लागले होते.त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.अशातच आता पुन्हा राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार,चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया,नागपूर, बीड,हिंगोली,यवतमाळ,परभणी,छत्रपती संभाजीनगर, नांदेड,लातूर आणि धाराशिव या बारा जिल्ह्यांना पावसाच्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.अश्यातच कोकणातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,सोसाट्याचा वारा (३०ते ४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,सोसाट्याचा वारा (४० ते ५० किमी प्रतितास वेग)आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे विजांचे कडकडाट व सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसापासून बचाव करण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!