Monday, December 15, 2025
Homeकोल्हापूरवडिलांच्या मृत्यूनंतर मुलानेच लावून दिला आईचा दुसरा लग्न...!- विधवा प्रथा बंद करून...

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलानेच लावून दिला आईचा दुसरा लग्न…!- विधवा प्रथा बंद करून पुरोगामी चळवळीची नवी दिशा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्यूज वृत्त 

कोल्हापूर :-पतीच्या निधनाने आई सतत दुःखी राहायची.समाजात वेगळी वागणूक मिळू नये म्हणून आईचे दुसरे लग्न लावण्याचा धाडसी निर्णय मुलगा युवराजने घेतला.शेतकरी असलेल्या पाहुण्यातीलच व्यक्ती मारुती व्हटकर हे युवराजला योग्य वाटल्याने त्याने पुढची बोलणी सुरू ठेवली. आईला याबाबतची माहिती दिली.मात्र आईने यास स्पष्ट नकार दिला. काही दिवस तिची समजूत काढण्यात गेली.मुलाच्या हट्टापुढे शेवटी आई लग्नास तयार झाली.त्यापूर्वी तिने पाहुण्यांसह गल्लीतील काही महिलांच्या कानावर ही गोष्ट घातली.मुलगा पाठीशी असल्याने सर्वांनी तिला पाठिंबा दिला.१२ जानेवारीला पै-पाहुणे,शेजाऱ्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला.युवराजची इच्छा पूर्ण झाली. त्याच्या निर्णयाने कोल्हापूरने पुरोगामी चळवळीत आणखी एक नवे पाऊल टाकले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (ता. शिरोळ) गावाने विधवा प्रथा बंद करून राज्यालाच नव्हे तर देशाला पुरोगामी चळवळीची दिशा दिली. याचे अनुकरण महाराष्ट्रातील अनेक गावांसह कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेशमधील गावांनी केले.याच चळवळीत पुढचे पाऊल युवराज शेले या युवकाने टाकले आहे. युवराजचे आई- वडील नारायण व रत्ना यांचा २५ वर्षांपूर्वी विवाह झाला. वडील सेंट्रिग काम करायचे. आई घरकाम करत त्यांना मदत करायची. त्यांचा संसार सुखाने सुरू होता. युवराजचे त्यावेळी शिक्षण सुरू होते.काही वर्षांपूर्वी कामावरून घरी परतताना नारायण यांचा अपघातात मृत्यू झाला होता. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!