Saturday, May 2, 2026
Homeकोल्हापूरआम्ही तयार आहोत; अर्ध्या पगारावर काम करायला; तेही विना पेन्शन- सुशिक्षित बेरोजगार...

आम्ही तयार आहोत; अर्ध्या पगारावर काम करायला; तेही विना पेन्शन- सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीचा मोर्चा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोल्हापूर :- जुनी पेन्शन योजना थांबवून महाराष्ट्र राज्याला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आपण मोर्च्यात सहभागी व्हा; असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले.त्यानंतर आज शुक्रवारी १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जुन्या पेन्शन विरोधात कोल्हापुरात बेरोजगार युवक युवतीचा मोर्चा काढण्यात आला.

सोशल मीडियातील पोस्ट बघून काही बेरोजगार युवक दसरा चौकात जमले होते.दोन दिवसांत रीतसर परवानगी काढून पुन्हा मोर्चा काढणार असल्याचा निर्धार बेरोजगार युवकांनी केला आहे.

राज्यात एकीकदे बेरोजगारांच्या हाताला काम नाही.शेतकऱ्यांच्या पिकाला दाम मिळत नाही. नोकरदार हजारो रुपये कमवतात.त्यातल्या त्यात काही कर्मचारी दोन नंबरचे पैसे कमवतात.काही कर्मचारी कमिशनवर काम करतात.हे सारे सुरू असताना त्यांना जुनी पेन्शन योजना कशासाठी असा सवाल बेरोजगार युवकांनी केला आहे.


आज कोल्हापुरात बेरोजगार एकत्र आले.यानंतर पुन्हा इतर शहरातील बेरोजगार जुन्या पेन्शनविरोधात एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

९० टक्के आमदार,खासदार हे करोडपती आहेत. त्यांना खरचं पेन्शनची गरज आहे का?असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विचारला.जुनी पेन्शन योजना लागू करू नका.त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढा आणि लोकप्रतिनिधींना मिळणारी पेन्शन बंद करा.सर्वांचीच पेन्शन बंद करा; अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही.बेरोजगारांना काम मिळत नाही आणि सरकारी नोकरदारांना हजारो रुपये पगार मिळतो.तरी त्यांना पेन्शनची गरज काय? असा सवाल सामान्य लोकांकडून विचारला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!