Friday, June 19, 2026
Homeकोल्हापूरआम्ही तयार आहोत; अर्ध्या पगारावर काम करायला; तेही विना पेन्शन- सुशिक्षित बेरोजगार...

आम्ही तयार आहोत; अर्ध्या पगारावर काम करायला; तेही विना पेन्शन- सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीचा मोर्चा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोल्हापूर :- जुनी पेन्शन योजना थांबवून महाराष्ट्र राज्याला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आपण मोर्च्यात सहभागी व्हा; असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले.त्यानंतर आज शुक्रवारी १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जुन्या पेन्शन विरोधात कोल्हापुरात बेरोजगार युवक युवतीचा मोर्चा काढण्यात आला.

सोशल मीडियातील पोस्ट बघून काही बेरोजगार युवक दसरा चौकात जमले होते.दोन दिवसांत रीतसर परवानगी काढून पुन्हा मोर्चा काढणार असल्याचा निर्धार बेरोजगार युवकांनी केला आहे.

राज्यात एकीकदे बेरोजगारांच्या हाताला काम नाही.शेतकऱ्यांच्या पिकाला दाम मिळत नाही. नोकरदार हजारो रुपये कमवतात.त्यातल्या त्यात काही कर्मचारी दोन नंबरचे पैसे कमवतात.काही कर्मचारी कमिशनवर काम करतात.हे सारे सुरू असताना त्यांना जुनी पेन्शन योजना कशासाठी असा सवाल बेरोजगार युवकांनी केला आहे.


आज कोल्हापुरात बेरोजगार एकत्र आले.यानंतर पुन्हा इतर शहरातील बेरोजगार जुन्या पेन्शनविरोधात एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

९० टक्के आमदार,खासदार हे करोडपती आहेत. त्यांना खरचं पेन्शनची गरज आहे का?असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विचारला.जुनी पेन्शन योजना लागू करू नका.त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढा आणि लोकप्रतिनिधींना मिळणारी पेन्शन बंद करा.सर्वांचीच पेन्शन बंद करा; अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही.बेरोजगारांना काम मिळत नाही आणि सरकारी नोकरदारांना हजारो रुपये पगार मिळतो.तरी त्यांना पेन्शनची गरज काय? असा सवाल सामान्य लोकांकडून विचारला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!