Wednesday, March 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाचखोर अधिकाऱ्यांची हयगय केली जाणार नाही...महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

लाचखोर अधिकाऱ्यांची हयगय केली जाणार नाही…महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या घडीला लाच घेण्याचे प्रमाण वाढले असून महसूल सप्ताह सुरू असतांना एक तहसीलदार लाच घेतो; ही शरमेची बाब आहे. लाच घेताना पकडलो गेलो; याची भीती वा कोणते सोयरसुतकच या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटत नाही.तीन-चार महिन्यांत पुन्हा कामावर रुजू होतात. लाच घेतल्यानंतर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कारवाईच्या नियमात बदल करावा लागेल; अशी गरज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.विखे पाटील यांनी मंगळवारी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा आढावा घेतला.त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आमदार संग्राम जगताप,जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील,भाजपचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) विठ्ठल लंघे आदी उपस्थित होते.
राज्यभरात १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. त्यात गोरगरीब जनतेला शासकीय योजनांचा लाभ देण्याचे काम सुरू होते.अशा परिस्थितीत नाशिक येथील एक तहसीलदार लाचेच्या जाळ्यात सापडला. याकडे विखे पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले. महसूल सप्ताहात तहसीलदाराचे हे कृत्य अतिशय शरमेची बाब आहे. अधिकारी व कर्मचारी लाच घेतात.पकडल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा कामावर रुजू होतात. केलेल्या कृत्याचे त्यांना सोयरसुतक नसते. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई आवश्यक आहे. त्यासाठी नियमात बदल करावा लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून नियमात बदल करावा लागेल. तरच या भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे विखे यांनी नमूद केले.महापुरुषांबाबत गरळ ओकण्याचे प्रकार सुरू आहेत. शासनाने प्रत्येक घटनेची दखल घेतली आहे. कारवाई सुरू आहे. कोणाला पाठीशी घातले जाणार नाही. संभाजी भिडेंबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे.त्यामुळे याबाबत मी बोलणार नाही, असे विखे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ३० हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डीत ११ ऑगस्टला कार्यक्रम होत आहे. लाभार्थ्यांना ने आण करण्यासाठी सहाशे बसची व्यवस्था केली आहे.हा कार्यक्रम नगर येथे घेण्याचे नियोजन होते. परंतु पाऊस आणि हवामान बदलाचा विचार करून शिर्डीला कार्यक्रम ठेवला आहे. या कार्यक्रमाला किती खर्च येणार हे महत्त्वाचे नाही, तर गोरगरीब जनतेला लाभ मिळावा हा उद्देश असल्याचे महसूलमंत्री विखे यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे पोलिसांना पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात प्रलंबित ई-चालान वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.मात्र,या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी पोलीस वाहनचालकांना रस्त्यात अडवून 'दंड आत्ताच भरा,अन्यथा...

सरपण गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला; इसम ठार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जंगल परिसरात सरपण गोळा करीत असतांना वाघाने हल्ला चढवून एका इसमास ठार केल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील...

ऐतिहासिक यश; नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेस ‘आयएसओ’ मानांकन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर या शाळेला आज,बुधवार ११ मार्च रोजी ISO 9001:2015 Quality...

शिक्षकाचे पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी चपलेने बदडले..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आज,मंगळवार १० मार्च रोजी उघडकीस आली आहे.एका ५४ वर्षीय शिक्षकाने इयत्ता चौथीच्या पाच विद्यार्थिनींशी अश्लील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!