उदेक न्युज वृत्त
गडचिरोली :- उन्हाळ्यात रोजगाराची हमी नसल्याने त्यासाठी एकच सर्वसामान्य नागरिक तसेच गोर गरीब जनतेसाठी पर्याय असलेला एकमेव उपाय म्हणून रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली.त्यानुसार ग्रामीण भागातील अनेकांना रोजगार मिळाला आहे.सध्या स्थितीत जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे जोमात सुरु असून,सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ही कामे केली जात आहेत.कामावर महिला मजूरांसह तरूण तसेच ६० वर्षांच्या आतील मजूर आहेत.गेल्या आठवडाभरापासून राज्यभरातील तापमानात वाढ झाली.जिल्ह्यातील तापमान ४२ अंशावर पोहचले आहे.अशास्थितीत रोहयो कामावर राबणाऱ्या मजूरांना ऊन्हाचा तडाखा बसून तब्येत बिघडण्याची शक्यता बळावली आहे.काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी रोजगारलगेगी बोलीवर यामुले सर्वसामान्यांसह करणा-यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आठवडाभरापासून पुन्हा राज्यासह जिल्ह्याचे तापमान वाढू लागले आहे. सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यात नोंद करण्यात आले असून गडचिरोली जिल्ह्याचाही पारा सातत्याने वाढत आहे.याचा फटका मजूरांनाही बसत आहे. रोहयो
कामावर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरीक काम करीत असतात.यात महिला मजूर वर्गाचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहेत.मागील काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान सातत्याने वाढत असल्याने रोहयो कामावर असलेल्या महिला मजूरांचेही हाल होत आहेत.याकडे रोहयो विभागाने लक्ष घालणे आवश्यक आहे.

