Tuesday, June 30, 2026
Homeगडचिरोलीरेतीचे नदीपात्र गडगंज श्रीमंत रेती तस्करांच्या स्वाधीन; मंत्र्यांचा हवाला देत अवैध वाळू...

रेतीचे नदीपात्र गडगंज श्रीमंत रेती तस्करांच्या स्वाधीन; मंत्र्यांचा हवाला देत अवैध वाळू उपसा… – मुसक्या आवळण्यात महसूल विभाग नापास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 
गडचिरोली :-जिल्ह्यातील बाराही तालुक्यात अवैध वाळू उपस्याने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. अवैध वाळू उपसा प्रकरणी पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नसल्याने वाळू चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात महसूल विभाग नापास झाल्याचे दिसून येत आहे.अशातच दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या सुमारास केजीएफ(KGF) चित्रपटाप्रमाणे जेसीबी,पोकलॅनसह रोजंदारीवर नेमणूक झालेले तस्कर फावडे,घमेले घेऊन नदीपात्र पोखरू लागल्याने जणूकाही रेतीचे नदीपात्र गडगंज श्रीमंत रेती तस्करांच्या स्वाधीन झाले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रेती घाट लिलाव प्रक्रिया
रखडली आहे.नागरिकांना स्वस्त दरात रेती मिळावी म्हणून शासनाने नवीन वाळू धोरण २०२३ मध्ये जाहीर केले.या धोरणानुसार राज्यात प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये वाळू विक्रीचा दर ठरविण्यात आला होता.नवीन वाळू धोरणानुसार नागरिकांना स्वस्त दरात रेती उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, सद्यस्थितीत वाळू डेपोच सुरू झाले नसल्याने ‘वाळू धोरण २०२३’ धाब्यावर असल्याचे चित्र आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या काही तालुक्यात वाळू धोरणानुसार डेपो सुरू करण्यात आले होते.अशातही वाळू चोरट्यांनी वाळू धोरणाचा बट्ट्याबोळ करून ठेवला होता; ज्या ठिकाणाहून वाळू उपसा करायचा होता; अशा ठिकाणाहून उपसा न करता दुसऱ्याच ठिकाणाहून वाळू उपसा करून कोट्यवधी रुपयांची वाळू चोरी करून शासनाला चुना लावला होता.अशातही अनेकांनी चुप्पी साधून आपलीच पोळी शेकली होती.
वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया राबवित असतांना सर्वप्रथम वाळू घाटाच्या लिलावासाठी जाहिरात देण्यापूर्वी पर्यावरण विभागाच्या अनुमतीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पर्यावरण विभागास मान्यतेकरिता सादर करावे लागते.पर्यावरण विभागाची अनुमती प्राप्त झाल्यानंतरच लिलाव प्रक्रिया यशस्वी होते.मात्र,काही तालुक्यात बऱ्याच वर्षांपासून पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली नसल्याने लिलाव प्रक्रिया रखडली आहे.यंदा तरी पर्यावरण विभाग गडचिरोली जिल्ह्यावर मेहरबान होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती तस्कर सक्रिय होऊन काही ठिकाणी महसूल विभागास मंत्र्यांचा हवाला देत नदीपात्र पोखरू लागले आहेत.त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला चुना लागत असल्याचे वास्तव आहे.हा सारा प्रकार प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत असून केवळ थातूरमातूर कारवाई केली जात असल्याने याचे नवल वाटत आहे.त्यातच प्रशासन गोर-गरिबांना कारवाईचा धाक दाखवते तर गडगंज श्रीमंत रेती तस्करांना नदीपात्र त्यांच्या स्वाधीन करतो.या विरोधाभासाला प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी जबाबदार असल्याचा सूर सर्वसामान्यांमध्ये आहे.त्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेऊन वाळू तस्करी रोखावी; अशी मागणी होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भव्य प्रवेशोत्सवातून शिक्षणाचा नवा अध्याय.. – महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड देसाईगंज येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आयएसओ मानांकन प्राप्त महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा, नैनपूर वार्ड,देसाईगंज येथे आज,मंगळवार ३० जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवसानिमित्त प्रवेशोत्सव...

साहित्यिक व कलावंतांना दरमहा ५ हजार मानधन; ऑनलाइन अर्जासह ऑफलाइन प्रस्ताव सादर करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना' अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या...

उद्यापासून ८ लाख २८ हजार ९०४ मतदारांची होणार पडताळणी; बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात "मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६" प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी...

यंदाही मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे वारकऱ्यांसाठी ‘चरण सेवा’ उपक्रम.. – ३ हजार लिटर आयुर्वेदिक तेलाद्वारे करण्यात येणार मालिश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे 'चरण सेवा' उपक्रम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!