Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीयुवक-युवतींसाठी विविध निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन.. - स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची...

युवक-युवतींसाठी विविध निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन.. – स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची सुवर्णसंधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी(अमृत)आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ‘अमृत’ लक्षित गटातील युवक-युवतींसाठी विविध निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी,के.पी.टाकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अमृत’ लक्षित गटातील उमेदवारांसाठी चार प्रकारचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत,ज्यांचा कालावधी १८ दिवसांचा असेल:
अमृत सूर्यमित्र (सौर): सौर ऊर्जा क्षेत्रातील कौशल्यांवर आधारित.
अमृत-बेकरी: बेकरी उत्पादनांच्या निर्मिती आणि व्यवस्थापनावर केंद्रित.
अमृत-आयात निर्यात: आंतरराष्ट्रीय व्यापार आणि निर्यात प्रक्रियेचे ज्ञान.
अमृत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण (REDP): उद्योजकतेच्या सर्व पैलूंवर व्यापक मार्गदर्शन.
याशिवाय,तीन प्रकारचे अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम देखील उपलब्ध असतील:
अमृत-उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम: २१ दिवसांचा कालावधी.
अमृत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम: ३० दिवसांचा कालावधी, संबंधित व्यवसायाच्या तांत्रिक प्रात्यक्षिकांवर विशेष भर.
अमृत क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम: ०६ दिवसांचा कालावधी.
या सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तांत्रिक बाबींवरील प्रात्यक्षिकांसोबतच उद्योजकीय मार्गदर्शन,व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक,व्यवस्थापकीय आणि कायदेशीर माहिती,प्रभावी मार्केटिंग कौशल्ये, ग्राहकांशी संबंध निर्माण करून बाजारात व्यवसाय वाढवण्याचे तंत्र,शासनाच्या विविध योजना,बँकिंग प्रक्रिया,प्रकल्प अहवाल तयार करणे,उद्योगासाठी आवश्यक कागदपत्रे,उद्योजकीय मानसिकता आणि गुणसंपदा यांसारख्या विविध विषयांवर तज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर,व्यवसाय उभारणीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे पाठपुरावा केला जाईल आणि प्रशिक्षणार्थींना व्यवसाय सुरू करेपर्यंत मोफत मार्गदर्शन उपलब्ध असेल,असेही टाकळे यांनी नमूद केले.
  • पात्रता आणि अर्ज प्रक्रिया👇
‘अमृत’ लक्षित गटातील किमान ८ वी पास असलेले आणि कोणत्याही शासकीय कागदपत्रांवर जातीचा उल्लेख तसेच तहसीलदार यांचा रहिवाशी आणि उत्पन्न दाखला असलेले सर्व इच्छुक युवक-युवती या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.MCED द्वारे जिल्हा उद्योग केंद्र,कॉम्प्लेक्स एरिया,MIDC रोड, गडचिरोली येथे सध्या निवड प्रक्रिया सुरू आहे.पात्र लाभार्थींची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
इच्छुक उमेदवारांनी ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
के.पी.टाकळे (प्रकल्प अधिकारी,MCED गडचिरोली): मो.९१६८६६७१८१
विक्रांत पांडे (अमृत जिल्हा व्यवस्थापक,गडचिरोली): मो.९८३४३२३७२७
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नागपूर विभागाचे विभागीय अधिकारी हेमंत वाघमारे यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक,युवती, उद्योजक आणि नवउद्योजकांनी या निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!