Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयुद्धजन्य परिस्थितीत फेक न्युजने सरकारची वाढली डोकेदुखी..! - सोशल मीडियावरही अफवांचा भडिमार..

युद्धजन्य परिस्थितीत फेक न्युजने सरकारची वाढली डोकेदुखी..! – सोशल मीडियावरही अफवांचा भडिमार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-युद्धजन्य परिस्थितीत विविध माध्यमांद्वारे फेक न्युज म्हणजेच ज्यात काही तथ्य नाही व कसलाही संबंध नसतांनाही हातचे बनाव करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून भीतीचे वातावरण पसरवले जात आहे.भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता, गेल्या दोन दिवसांपासून फेक न्युजने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.अशातच महाराष्ट्र सायबर सेलने काल,शुक्रवारी ५ हजार ३०० फेक न्यूजचा शोध घेतला व ते हटविण्यात आले.त्यातच सर्वात सर्वाधिक अफवा सोशल मीडियावरून पसरविल्या जात आहेत.
आर्मेनिया अजरबैजान युद्धाचे फोटो व्हिडीओ शेअर करत ते भारत-पाकिस्तान युद्धाचे दाखविण्यात येत
आहेत.अशा अनेक फेक गोष्टी जनमानसात व्हायरल करण्याचा प्रयत्न शत्रूच्या गोटातून केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अश्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.पसरविण्यात येणाऱ्या अफवांमुळे मुंबईत भीतीचे वातावरण असून, सुट्टीच्या हंगामात नियोजन नसतांना अनेक कुटुंबे आपापल्या गावी निघाल्याचे चित्र आहे.महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख यशस्वी यादव यांच्या माहितीनुसार,२३ एप्रिलपासून जवळपास दहा लाख सायबर हल्ल्यांची देशभरात नोंद झाली आहे.हे हल्ले रोखण्यास सायबर विभागाला यश आले आहे.यामागे एक मोठा गट काम करत असल्याचा संशय आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!