- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-युद्धजन्य परिस्थितीत विविध माध्यमांद्वारे फेक न्युज म्हणजेच ज्यात काही तथ्य नाही व कसलाही संबंध नसतांनाही हातचे बनाव करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून भीतीचे वातावरण पसरवले जात आहे.भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता, गेल्या दोन दिवसांपासून फेक न्युजने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.अशातच महाराष्ट्र सायबर सेलने काल,शुक्रवारी ५ हजार ३०० फेक न्यूजचा शोध घेतला व ते हटविण्यात आले.त्यातच सर्वात सर्वाधिक अफवा सोशल मीडियावरून पसरविल्या जात आहेत.
आर्मेनिया अजरबैजान युद्धाचे फोटो व्हिडीओ शेअर करत ते भारत-पाकिस्तान युद्धाचे दाखविण्यात येत
आहेत.अशा अनेक फेक गोष्टी जनमानसात व्हायरल करण्याचा प्रयत्न शत्रूच्या गोटातून केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अश्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.पसरविण्यात येणाऱ्या अफवांमुळे मुंबईत भीतीचे वातावरण असून, सुट्टीच्या हंगामात नियोजन नसतांना अनेक कुटुंबे आपापल्या गावी निघाल्याचे चित्र आहे.महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख यशस्वी यादव यांच्या माहितीनुसार,२३ एप्रिलपासून जवळपास दहा लाख सायबर हल्ल्यांची देशभरात नोंद झाली आहे.हे हल्ले रोखण्यास सायबर विभागाला यश आले आहे.यामागे एक मोठा गट काम करत असल्याचा संशय आहे.
- Advertisement -