- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पत्नी व मुलांसोबत बँकेतून पैसे काढले.काढलेल्या पैस्यातून संपूर्ण रक्कम पत्नीकडे दिली व त्यातून पाचशे रुपये रुपये स्वतःकडे ठेवून ‘मी फिरून येतो’,असे सांगून गेला तो परतलाच नाही. कुटूंबीय तसेच नातलगांनी इतरत्र सर्वत्र शोधाशोध केली.मात्र,कुठेही थांगपत्ता लागलेला नाही.अश्यातच तब्बल चोवीस दिवसांनी आढळला तो शरीराचा सांगाळा.४३ वर्षीय विजय कस्तुरे रा.येरकड, ता.धानोरा असे मृतकाचे नाव असून तो मागील महिन्याच्या १८ जून २०२५ पासून बेपत्ता होता.विजय कस्तुरे हा मिळेल ते काम व मजुरी करून संसाराचा गाडा हाकत होता.मृत विजय कस्तुरे यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.घरचा आधारवड गेल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.त्यातच तब्बल चोवीस दिवसांनी त्याचा चवेला गाव परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत सांगाळा आढळून आल्याने हत्या की आत्महत्या? अश्या चर्चांना आता ऊत आले आहे.सदरची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यात काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.गुरे राखणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने प्रकरणास वाचा फुटली.प्रकरणाचा पुढील तपास धानोरा पोलीस प्रशासन करीत आहे.हत्या की आत्महत्या हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
- Advertisement -

