Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोली'मी फिरून येतो'; असे पत्नीला सांगून गेला तो परतलाच नाही; मिळाला तो...

‘मी फिरून येतो’; असे पत्नीला सांगून गेला तो परतलाच नाही; मिळाला तो शरीराचा सांगाळा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पत्नी व मुलांसोबत बँकेतून पैसे काढले.काढलेल्या पैस्यातून संपूर्ण रक्कम पत्नीकडे दिली व त्यातून पाचशे रुपये रुपये स्वतःकडे ठेवून ‘मी फिरून येतो’,असे सांगून गेला तो परतलाच नाही. कुटूंबीय तसेच नातलगांनी इतरत्र सर्वत्र शोधाशोध केली.मात्र,कुठेही थांगपत्ता लागलेला नाही.अश्यातच तब्बल चोवीस दिवसांनी आढळला तो शरीराचा सांगाळा.४३ वर्षीय विजय कस्तुरे रा.येरकड, ता.धानोरा असे मृतकाचे नाव असून तो मागील महिन्याच्या १८ जून २०२५ पासून बेपत्ता होता.विजय कस्तुरे हा मिळेल ते काम व मजुरी करून संसाराचा गाडा हाकत होता.मृत विजय कस्तुरे यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.घरचा आधारवड गेल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.त्यातच तब्बल चोवीस दिवसांनी त्याचा चवेला गाव परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत सांगाळा आढळून आल्याने हत्या की आत्महत्या? अश्या चर्चांना आता ऊत आले आहे.सदरची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यात काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.गुरे राखणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने प्रकरणास वाचा फुटली.प्रकरणाचा पुढील तपास धानोरा पोलीस प्रशासन करीत आहे.हत्या की आत्महत्या हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!