Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीमहिलेचा विनयभंग करणाऱ्या ३६ वर्षीय इसमास ३ महिन्यांचा कारावास.. - अहेरी च्या...

महिलेचा विनयभंग करणाऱ्या ३६ वर्षीय इसमास ३ महिन्यांचा कारावास.. – अहेरी च्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली येथील एटापल्ली नजिक गावाबाहेर प्रातःविधी(शौचास) करण्यास जाणाऱ्या महिलेस आडवून तिचा विनयभंग करण्याची घटना घडली होती.सदरची घटना २४ ऑक्टोबर २०१७ रोजी घडली होती.घटनेतील संशयित आरोपीला अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ महिन्यांचा कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.जगन्नाथ शिवकुमार बैरागी वय ३६ वर्षे, रा.पंदेवाही,ता.एटापल्ली असे आरोपीचे नाव आहे.
घटना घडलेल्या दिवशी जगन्नाथ पीडितेच्या मागे जात होता.यानंतर पीडितेला आपला कोणतरी पाठलाग करत असल्याचे समजताच ती मागे फिरली.यानंतर जगन्नाथने तिला रस्त्यावर अडवून तिच्यासोबत अभद्र वर्तवणूक करुन तिचा विनयभंग केला.यानंतर महिलेने संशयिताविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. एटापल्लीचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत भोसले यांनी तपास पूर्ण केल्यानंतर अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.दरम्यान, पोलिसांनी संशयिताला अटक केली.यानतंर त्याच्यावर गुन्हा नोंद करुन त्याचावर मागील सात वर्ष न्यायालयात घटला सुरु होता. आज,शुक्रवारी १३ सप्टेंबरला या प्रकरणाचा निकाल लागला.अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.बावणकर यांनी साक्षदारांचा जबाब आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी जगन्नाथ बैरागी यास ३ महिन्यांचा कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!