उद्रेक न्युज वृत्त
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):- आपण नेहमीच बघत असतो की काही शहरे वा गावाची त्याच्या वेगळेपणामुळे किंवा वैशिष्ट्यांमुळे ख्याती निर्माण झालेली असते.असाच महाराष्ट्रात एक गाव आहे की,गावामधे केवळ ७५ घरे आहेत.मात्र गावात ५० पेक्षा जास्त मुले सरकारी नोकरीवर आहेत.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील सानपवाडी असे गावाचे नाव आहे.गावात पाच इंजिनियर,सहा डॉक्टर,एक उपविभागीय अधिकारी,एक सहाय्यक पोलिस निरीक्षक,एक पोलीस निरीक्षक,२३ पोलीस कर्मचारी,पाच शिक्षक आणि सहा जण भारतीय सैन्य दलात असून गावची लोकसंख्या ४०० इतकी आहे.
दरवर्षी कुठल्याही प्रकारची भरती असो; भरती परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची गावातील नागरिक आतुरतेने वाट बघत असतात. सुरुवातीपासूनच म्हणजेच प्राथमिक शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गावातील शाळेत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व प्रेरणा देण्यात येत असल्याने विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी हिरीहिरीने भाग घेऊन यश संपादन करीत असतात.प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना गोडी लागत असल्याने कोणत्याही शाखेची पदवी जरी मिळाली तरी स्वतःहून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतात.गावात एकप्रकारे तश्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे.