Thursday, January 22, 2026
Homeनागपूरमहसूल मंत्र्यांच्या धडक कारवाईने सर्वांचे थाटरे फरार.. आज एका उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन;...

महसूल मंत्र्यांच्या धडक कारवाईने सर्वांचे थाटरे फरार.. आज एका उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन; अवैध वाळू उपसा प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपुर :-नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे उद्या,रविवार १४ डिसेंबरला सूप वाजणार आहे; म्हणजेच हिवाळी अधिवेशनाची सांगता होणार आहे.तत्पूर्वी सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी तसेच विरोधकांनी विविध मुद्दे मांडून अधिवेशन गाजविण्याचा प्रयत्न केला.पण,राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला तो सर्वांचे थाटरे फरार करणारा ठरला आहे.विशेष म्हणजे,काल शुक्रवारी पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार,चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा जणांच्या निलंबनाची घोषणा केलेली असतांनाच परत आज,शनिवार १३ डिसेंबरला भंडारा जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणी उपविभागीय अधिकारी(SDM)गजेंद्र बालपांडे यांच्या निलंबनाची विधानसभेत घोषणा केली. त्याचबरोबर,सेवानिवृत्त झालेले तत्कालीन तहसीलदार महेंद्र सोनवणे यांच्यावरही गुन्हेगारी खटला दाखल करण्याची कारवाई केली जाईल,असे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.अवैध वाळू उपसा प्रकरणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.सदरचे प्रकरण हे दोन वाळू घाटांच्या डेपोंशी संबंधित असून बेटाळा दक्षिण आणि बेटाळा उत्तर येथील वाळू घाट केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर,मालाड,मुंबई या कंपनीला तीन वर्षांसाठी देण्यात आले होते.पवनीच्या तहसीलदारांना २५ मे २०२५ रोजी गुळेगाव येथील वाळू डेपोमध्ये ३४ हजार ६०० ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा झाल्याचा अहवाल तलाठींनी दिला होता.मात्र,तत्कालीन तहसीलदार महेंद्र सोनवणे आणि उपविभागीय अधिकारी बालपांडे यांनी तलाठींच्या अहवालावर कारवाई केली नाही.सोनवणे यांचे ‘सर्वात मोठे रॅकेट’ असून बालपांडे आणि सोनवणे यांनी बेकायदेशीर वाळू घाटांवर कधीही कारवाई केली नाही,उलट त्यांना संरक्षण दिले,ज्यामुळे शासनाचे मोठे नुकसान झाले,असा आरोप मंत्री बावनकुळे यांनी केला.प्रकरणात जिल्हा खनीकर्म अधिकारी यांची जास्त चूक असल्याचे मान्य करत खनीकर्म मंत्र्यांकडे जिल्हा खनीकर्म अधिकारी यांचीही चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे.आज उपविभागीय अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईने सर्वांचे धाबे दणाणले असून महसूल विभागातील काही अधिकारी,कर्मचारी अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी सारवासारव करून आम्ही काय केले,याचा लेखाजोखा मांडू लागलेत.हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत.. – आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील...

अधिकचे आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिकचे ओबीसी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा झाल्याचे...

थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन वनरक्षकाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन एका ३० वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावातील...

पिकअप वाहनाचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर १३ जखमी.. – आज सकाळच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील नांदगाव येथे आज,बुधवार २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला,तर १२ जणांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!