Saturday, August 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभविष्यात शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी..!

भविष्यात शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता आहे.अश्यातच सुधारित संचमान्यता निकषानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश शासनाने दिल्याने नव्या संचमान्यता निकषामुळे राज्यात हजारो शिक्षक पदे कमी होणार आहेत.यामुळे राज्यातील डोंगराळ,दुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागांतील कमी पटांच्या शाळांना याचा मोठा फटका बसणार आहे.यात गडचिरोली,अमरावती व डोंगरी-दुर्गम,आदिवासी भाग असलेल्या जिल्ह्यात याचा मोठा फटका बसणार आहे. विशेष म्हणजे,अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन करण्यात येणार आहे; पण,शिक्षक पदे कमी झाल्याने भविष्यात शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी आहे.२३ ऑक्टोंबर २०२५ रोजी शाळेच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार शासनाने २०२५-२६ ची संचमान्यता अंतिम केली आहे.१५ मार्च २०२४ रोजीच्या संच मान्यतेच्या सुधारित आदेशानुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन तीन मार्चपर्यंत जिल्हास्तरावर,२५ मार्चपर्यंत विभागस्तर आणि ३१ मार्चपर्यंत राज्यस्तरावर करण्याचे आदेश राज्याच्या प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळांना  मोठा फटका बसणार आहे.
  • विजय कोंबे,राज्याध्यक्ष,प्राथमिक शिक्षक समिती👇
शिक्षण कायद्यानुसार शाळात शिक्षक पदे मंजूर करणे आवश्यक आहे.मात्र,महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये बदल करून संचमान्यतेचे नवीन निकष आणले आहेत.त्याचा फटका ग्रामीण भागातील शाळांना बसणार आहे. शाळांच्या पटाऐवजी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

कर्जमाफी योजनेतील ३ हजार ८१२ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाने २ जून आणि १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.या योजनेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!