- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसांमध्ये द्यावी.त्यांना सांगा गाड्या करा,गाड्यांसाठी जे काही लागते ते त्यांना फोन पे करा, त्यांना सांगा येण्या-जाण्याचे जे काही लागते ते आम्हाला सांगा,असे वक्तव्य हिंगोलीच्या कळमनुरी येथील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.मतदारांना पैशाचे अमिष दाखवून मतदानाला आणण्याची भाषा केल्याने निवडणूक आयोग आता यावर काय कार्यवाही करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आमदार संतोष बांगर यांनी वक्तव्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे.हिंगोली जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.दरम्यान,उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच आमदार संतोष बागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे.येत्या २४ तारखेला आमदार संतोष बांगर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
- Advertisement -

