उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- सध्याच्या घडीला विविध शासकीय कार्यालयात MPSC,UPSC व इतर परीक्षा पास होऊन मोठ-मोठ्या पदावर अनेकजण अधिकारी, कर्मचारी विराजमान झाल्याचे दिसून येतात.मात्र साधा,सरळ आणि सोपा असलेला ‘माहितीचा अधिकार कायदा २००५’ हेच त्यांना कळेना…! त्यामुळे ‘खेल खत्तम मिटू झोऱ्यात’ …असे हल्ली चित्र निदर्शनास येऊ लागल्याने अशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा; अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मुख्यत्वे म्हणजे, माहिती अधिकार कायद्या ‘२००५’ नुसार ३० दिवसांत माहिती न दिल्यास पुढील ३० दिवसांत प्रथम अपील दाखल केले जाते.मात्र अपील करुनही काही अपिलीय अधिकारी सुनावणी घेतांना दिसून येत नाही.कारण की, ‘मनात असते खोट व त्यांना मिळतेय नोट’..अशी हल्ली…अवस्था निर्माण झाली असल्याने ‘आव बे लड्डू; जाव बे लड्डू’ करतांना दिसून येत आहेत.त्यांना केवळ खिसे गरम करण्यात रस असल्याने ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ होतांना दिसून येत आहे.अशांवर कारवाई करण्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते धजावणार असल्याची माहिती आहे.