Wednesday, May 14, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तपाच शत्रूंना यमसदनी पाठवत जवानास वीरमरण..
spot_img

पाच शत्रूंना यमसदनी पाठवत जवानास वीरमरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-निर्दयी पाकिस्तान निष्पाप लोकांचे जीव घेऊन साध्य काय करते? हेच कळेनासे झाले आहे.दहशतवाद्यांना पाठीशी धरून,हातात बांगड्या घालून स्वतःला पाकिस्तान मोठा हुशार समजू लागला आहे.सध्या स्थितीत ‘अक्कल बडी की भैस’ अशी अवस्था पाकिस्तानची झाली आहे.अशातच पाकिस्तान सुधरण्याचे नावच घेत नसल्याने भारताने चोख प्रत्युत्तर देत पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यास सुरुवात केली आहे.भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांचे अड्डे  नष्ट केले.त्यामुळे भांबरेजलेला पाकिस्तान मिसाइल-ड्रोनने भारतावर हल्ले करत आहे; दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी जवान सीमेलगतच्या भागात गोळीबार करत आहेत.त्यातच आज,शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणारे जवान मुरली नाईक शहीद झाले.पण पाच शत्रूंना यमसदनी पाठवत जवानास वीरमरण आले.काश्मीर सीमेवर पहाटे तीनच्या सुमारास अचानक सुरु झालेल्या गोळीबारात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला.तेव्हा जवान मुरली नायक यांनी अतुलनीय धैर्य दाखवत पाच जणांचा खात्मा केला.शत्रूशी झुंज देतांना मुरली नायक यांना वीरमरण आले.जवान मुरली नाईक यांचे मूळ गाव आंध्रप्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील कल्की तांडा असून हल्ली मुंबईच्या घाटकोपर येथील कामराजनगर येथे वास्तव्याला होते.नाईक यांचे कुटुंबीय २ मे ला त्यांच्या मूळ गावी गेले असल्याने शहीद जवान मुरली नाईक यांच्या पार्थिवावर उद्याला मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहे.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाला फेक खेळाडू नीरज चोप्राची भारतीय सैन्य दलाच्या लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्ती..

उद्रेक न्युज वृत्त :-आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदक,सिल्व्हर पदक तसेच देशतांर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रीडा जगतात विविध पदक विजेता भाला फेक खेळाडू नीरज चोप्राची आज,बुधवार...

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; आता बळींची संख्या झाली सहा..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांचे हल्ले वाढू लागलेत.अवघ्या पाच दिवसांत वाघांच्या हल्ल्यात सहा महिलांचा मृत्यू झाला आहे.शनिवार १० मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथे...

चक्क पोलिसांनीच पकडले पोलिसाला..!

उद्रेक न्युज वृत्त :-आपण अनेकदा चोर पोलीस खेळ खेळला असेल,काहींनी नसेलही खेळला.पण आम्ही लहानपणी ऐकले की,पोलीस हे चोरांना पकडत असतात.मात्र,एका प्रकरणात चक्क पोलिसांनीच पोलिसाला पकडण्याची...

अखेर आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नांना यश.. आता घरकुल धारकांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार ऑफलाईन पद्धतीने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-घरकुल धारकांसाठी आनंदाची बातमी असून उद्यापासून म्हणजेच गुरुवार १५ मे पासून गडचिरोली जिल्ह्यातील घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना पाच ब्रास मोफत वाळू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!