Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपाच शत्रूंना यमसदनी पाठवत जवानास वीरमरण..

पाच शत्रूंना यमसदनी पाठवत जवानास वीरमरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-निर्दयी पाकिस्तान निष्पाप लोकांचे जीव घेऊन साध्य काय करते? हेच कळेनासे झाले आहे.दहशतवाद्यांना पाठीशी धरून,हातात बांगड्या घालून स्वतःला पाकिस्तान मोठा हुशार समजू लागला आहे.सध्या स्थितीत ‘अक्कल बडी की भैस’ अशी अवस्था पाकिस्तानची झाली आहे.अशातच पाकिस्तान सुधरण्याचे नावच घेत नसल्याने भारताने चोख प्रत्युत्तर देत पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यास सुरुवात केली आहे.भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांचे अड्डे  नष्ट केले.त्यामुळे भांबरेजलेला पाकिस्तान मिसाइल-ड्रोनने भारतावर हल्ले करत आहे; दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी जवान सीमेलगतच्या भागात गोळीबार करत आहेत.त्यातच आज,शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणारे जवान मुरली नाईक शहीद झाले.पण पाच शत्रूंना यमसदनी पाठवत जवानास वीरमरण आले.काश्मीर सीमेवर पहाटे तीनच्या सुमारास अचानक सुरु झालेल्या गोळीबारात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला.तेव्हा जवान मुरली नायक यांनी अतुलनीय धैर्य दाखवत पाच जणांचा खात्मा केला.शत्रूशी झुंज देतांना मुरली नायक यांना वीरमरण आले.जवान मुरली नाईक यांचे मूळ गाव आंध्रप्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील कल्की तांडा असून हल्ली मुंबईच्या घाटकोपर येथील कामराजनगर येथे वास्तव्याला होते.नाईक यांचे कुटुंबीय २ मे ला त्यांच्या मूळ गावी गेले असल्याने शहीद जवान मुरली नाईक यांच्या पार्थिवावर उद्याला मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!