Tuesday, April 21, 2026
Homeगडचिरोली'नाट्यश्री' तर्फे अविस्मरणीय कवी संमेलन- ४२ कवींनी घेतला भाग....

‘नाट्यश्री’ तर्फे अविस्मरणीय कवी संमेलन- ४२ कवींनी घेतला भाग….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली’ च्या वतीने झाडीपट्टीतील ज्येष्ठ कवी डॉ. देवेंद्र मुनघाटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध नाटककार व कवी भिमानंद मेश्राम यांचे उपस्थितीत नुकतेच कविसंमेलन घेण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी कवयित्री कुसुमताई आलाम,  पांडुरंग घोटेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कवि संमेलनात झाडीपट्टीतील एकूण ४२ कवींनी भाग घेऊन उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या.सामाजिक आशयाच्या,विषयाच्या व चळवळीच्या विविध कवितांनी संमेलनात चांगली रंगत आणली.संगीता ठलाल या कवयित्रीच्या ‘तुझी आई मी तुझी जननी’ या कवितेने संमेलनाची सुरुवात झाली तर नंदकिशोर नैताम या आदिवासी कविच्या ‘पोवरी’ या कवितेने पहिल्या आदिवासी डॉक्टर झालेल्या आदिवासी युवतीची ओळख करून दिली.नंदकिशोर मसराम या कवीने डफाच्या थापेवर ‘लेक सासरी चालली’ ही कविता गावून रसिकांची वाहवा मिळवली, तर सिद्धार्थ गोवर्धन यांच्या ‘मी जिथे राहतो ती दलितांची वस्ती आहे’ या कवितेने संमेलनास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. संगीता रामटेके यांची ‘सुशिक्षित बेरोजगार’ रूपाली मस्के यांची ‘चुकभुल’, विजय शेंडे यांची ‘माय माझी माय’, मिलिंद खोब्रागडे यांची ‘धागा मराठीचा’, सोनू आलाम यांची ‘मी युवा आहे’,राजरत्न पेटकर यांची ‘जबाबदार’, उपेंद्र रोहनकर यांची ‘पोरगी पावाले गेलतो’ ही झाडीबोलीतील कविता,गजानन गेडाम यांची ‘ती लाजताना’, कुसुमताई आलाम यांची ‘गुरुजींनी पाठीवर ठेवला हात’, देवेंद्र मुनघाटे यांची लोकप्रतिनिधींचे चिमटे घेणारी ‘वाट’, तर प्रमुख अतिथी भीमानंद मेश्राम यांच्या ‘गांधीजी स्वप्नात आले’ या आशयगर्भ कवितेने रसिक भारावून गेले. 

‘नाट्यश्री’ चे कवि संमेलन एक पर्वणी असते. दर्जेदार कवितांचा आस्वाद या संमेलनातून घ्यायला मिळतो. समाजाला दिशा देणारे हे कवीसंमेलन आहे’ असे प्रतिपादन  संमेलनाध्यक्ष देवेंद्र मुनघाटे यांनी  काढले. ‘आदिवासी व मागासवर्गीयांच्या व्यथा मांडणारे कवी संमेलन आहे’ असे मत आदिवासी साहित्यिका कुसुमताई आलाम यांनी मांडले.कवी संमेलनात संगीता ठलाल,दिलीप भैसारे, मंदाकिनी चरडे, नंदकिशोर नैताम, सुजाता अवचट,  नंदकिशोर मसराम, पप्पू सिन्हा रूपाली मस्के, तुळशीराम उंदीरवाडे,संगीता रामटेके, प्रदीपकुमार साखरे, भिमानंद मेश्राम, विजय शेंडे, निळकंठ रोहनकर, मिलिंद खोब्रागडे, सोनू आलाम, सिद्धार्थ गोवर्धन, पुरुषोत्तम ठाकरे, राजरत्न पेठकर, उपेंद्र रोहनकर, डॉ. देवेंद्र मुनघाटे, गजानन गेडाम, खुशाल म्हशाखेत्री, खेमराज हस्ते, वसंत चापले, अहिंसक दहिवले, राहुल शेंडे, स्वप्निल बांबोळे, विनायक जांपलवार, केवळ बगमारे, वामनदादा गेडाम,  वर्षा राजगडे, जितेंद्र रायपुरे, विजया पोगडे, महेंद्र ठाकरे इ. कवींनी आपापल्या स्वरचित कविता सादर केल्या.

कवी संमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन योगेंद्र गोहणे यांनी केले.सोबतच प्रत्येक कवींचा थोडक्यात साहित्यिक परिचय करून दिला.सहभागी सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र व झाडांची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.     

कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी प्रा.अरुण बुरे,गुणवंत शेंडे, चुडाराम बल्हारपुरे(संचालक),सोनू आलाम व दै. देशोन्नतीचे उपसंपादक नरेश बावणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खेडेगावच्या जंगलात जुगाराचा डाव; अड्ड्यावर पोलीसांची धाड.. – तब्बल २२ आरोपींना अटक करून ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील खेडेगावच्या जंगलात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री ते आज मंगळवारी पहाटेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन कुरखेडा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!