- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सध्याच्या घडीला सर्वात जास्त तरुण वर्ग विष प्राशन करणे,गळफास घेणे व इतर आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलतांना दिसून येतात.त्यामुळे तरुणांचे जीवन एवढे स्वस्त झाले की काय?अशी म्हणण्याची वेळ आली आहे.केवळ टोकाचे पाऊल उचलणे हाच एकमेव उपाय नसून आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद ठेऊन पुढील जीवनाचे सोने करणे आवश्यक आहे.तितकीच मानसिकता बदलणेही गरजेचे आहे.अश्यातच नागपूर शहरातील गंगाबाई घाट परिसरातील मॅकेनिककडे दुचाकी दुरुस्तीची कामे करणाऱ्या एका ३२ वर्षीय राहुल रामदास मते रा.वीरशी धनी,ता.मौदा, जि.नागपूर या तरुणास दारूचे व्यसन जडले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचे दारूचे व्यसन सुटावे, यासाठी काही दिवस भंडारा येथील व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले होते.घरी परतून काही दिवस होत नाही, तो मंगळवारी पुन्हा दारू प्यायला.दारू पिण्याचे लक्षात येताच वडील रागावले.त्यातच तो काल बुधवारच्या दुपारी त्याच्या एमएच ३१-१८१६ क्रमांकाच्या दुचाकीने वीरशीहून कामठी तालुक्याच्या नेरी शिवारात गेला.त्याने कन्हान नदीवरील पुलावर दुचाकी उभी केली आणि मित्राला आपण आत्महत्या करीत असल्याचा मॅसेज व मोबाइल फोनचा पासवर्ड पाठविला.मॅसेज प्राप्त होताच मित्रासह कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यापूर्वीच त्याने मोबाइल फोन दुचाकीच्या डिक्कीत ठेवून पुलावरून उडी घेत कन्हान नदीत आत्महत्या केली.पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याचा मृतदेह सापडला नाही.मात्र,अंधार होईपर्यंत शोधकार्य सुरूच होते.३२ वर्षीय राहुल मते याने आत्महत्या कां केली? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
- Advertisement -

