Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षली संघटना हादरली; कुख्यात नक्षली शरणागतीच्या वाटेवर..

नक्षली संघटना हादरली; कुख्यात नक्षली शरणागतीच्या वाटेवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’ (PLGA)बटालियनचा कुख्यात नक्षलवादी  हिडमा माडवी याचा १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरक्षा दलांनी खात्मा केला.त्यानंतर ही चळवळ चांगलीच हादरली आहे.अश्यातच आता त्याचा विश्वासू साथीदार बारसे देवा शरणागती पत्करण्याच्या तयारीत आहे.बारसे देवा जंगलातून सुरक्षित बाहेर येण्यासाठी सुकमा परिसरात एक कॉरिडोअर तयार करण्यात आला आहे.तो सरेंडर झाल्यास नक्षलवाद्यांची बटालियन जवळपास संपुष्टात येईल,असे म्हटले जात आहे.आंध्र प्रदेशच्या अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील एका चकमकीत जहाल नक्षलवादी हिडमा माडवी याचा सुरक्षा दलाने खात्मा केला.हिडमा याच्या मृत्यूनंतर छत्तीसगडच्या बस्तरची नक्षली संघटना चांगलीच हादरली आहे.हिडमा बस्तरच्या लोकल नेटवर्कला नक्षलवाद्यांशी जोडणारा महत्वाचा दुवा होता.हिडमा आणि बारसे देवा दोघेही सुकमाच्या पूर्वी गावाचे आहेत.दोन वर्षांपूर्वी हिडमाला सेंट्रल कमेटीमध्ये सहभागी करण्यात आले,तर त्याने बारसे देवाला ‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’ बटालियन नंबर एकचा कमांडर बनवला.मात्र,हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आणि हळूहळू सर्वच आत्मसमर्पण करू लागलेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!