Monday, December 15, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षली संघटना हादरली; कुख्यात नक्षली शरणागतीच्या वाटेवर..

नक्षली संघटना हादरली; कुख्यात नक्षली शरणागतीच्या वाटेवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’ (PLGA)बटालियनचा कुख्यात नक्षलवादी  हिडमा माडवी याचा १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरक्षा दलांनी खात्मा केला.त्यानंतर ही चळवळ चांगलीच हादरली आहे.अश्यातच आता त्याचा विश्वासू साथीदार बारसे देवा शरणागती पत्करण्याच्या तयारीत आहे.बारसे देवा जंगलातून सुरक्षित बाहेर येण्यासाठी सुकमा परिसरात एक कॉरिडोअर तयार करण्यात आला आहे.तो सरेंडर झाल्यास नक्षलवाद्यांची बटालियन जवळपास संपुष्टात येईल,असे म्हटले जात आहे.आंध्र प्रदेशच्या अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील एका चकमकीत जहाल नक्षलवादी हिडमा माडवी याचा सुरक्षा दलाने खात्मा केला.हिडमा याच्या मृत्यूनंतर छत्तीसगडच्या बस्तरची नक्षली संघटना चांगलीच हादरली आहे.हिडमा बस्तरच्या लोकल नेटवर्कला नक्षलवाद्यांशी जोडणारा महत्वाचा दुवा होता.हिडमा आणि बारसे देवा दोघेही सुकमाच्या पूर्वी गावाचे आहेत.दोन वर्षांपूर्वी हिडमाला सेंट्रल कमेटीमध्ये सहभागी करण्यात आले,तर त्याने बारसे देवाला ‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’ बटालियन नंबर एकचा कमांडर बनवला.मात्र,हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आणि हळूहळू सर्वच आत्मसमर्पण करू लागलेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!