- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देसाईगंज शहरात राजकीय भूकंप होतांना दिसून येत आहे.जस-जशी नगर परिषदेची निवडणूक जवळ येऊ लागली तस-तशी राजकीय वर्तुळात खलबली सुरू होऊन जणूकाही ‘एक्सचेंज ऑफर’ सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.अश्यातच उद्या,सोमवार १० नोव्हेंबरपासून नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.तत्पूर्वी म्हणजेच आज,रविवार ९ नोव्हेंबरला काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ब्रम्हपुरी येथील कमलाई निवास येथे भाजपचे माजी नगराध्यक्ष,अजित पवार गटातील
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस तसेच शिवसेनेचे शहराध्यक्ष यांनी काँग्रेसमध्ये जाहीरपणे पक्ष प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.पक्ष प्रवेशात भाजपचे माजी नगराध्यक्ष श्याम उईके,राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट)सरचिटणीस हंसराज लांडगे आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष विकास प्रधान,लुनकरण चौधरी,राधेश्याम पत्रे,अश्विन मुळे,आंबेडकरी चळवळीचे नेते साजन मेश्राम,पवन गेडाम,सहदेव पुराम यांचेसह विविध कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.या नेत्यांनी गेल्या काही वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय भूमिका निभावली आहे.पुढील येत्या काळात अनेक कार्यकर्ते कांग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती यावेळी दिली.सदरचा पक्षप्रवेश सोहळा हा आज दुपारी ब्रम्हपुरी येथील कमलाई निवास येथे उत्साहात पार पडला.यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी नवागतांचे स्वागत करतांना सांगितले की, “काँग्रेस ही विकास,सामाजिक समतेचा आणि जनतेच्या हिताची चळवळ आहे.आज अनुभवी आणि लोकाभिमुख नेते काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत,हे या पक्षाच्या वाढत्या जनाधाराचे द्योतक आहे.”
देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठे बळ मिळणार आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढेल,तर दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी(अजित पवार गट) आणि शिवसेनेच्या गोटात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.आमदार रामदास मसराम यांनी या प्रसंगी बोलतांना सांगितले की, “जनतेच्या प्रश्नांवर लढणारा आणि विकासाला प्राधान्य देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस. नव्या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे देसाईगंज आणि परिसरात पक्ष आणखी मजबूत होईल.”या सोहळ्यास जिल्हा काँग्रेस पदाधिकारी,नगरसेवक,युवक काँग्रेस, महिला काँग्रेस तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या नेत्यांच्या प्रवेशाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून,येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस विजयाची पताका फडकवेल,असा विश्वास व्यक्त केला.
- Advertisement -

