- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-जम्मू काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षानंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. घाटीतून कलम ३७० हटवल्यानंतर लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी काश्मीरची जनता आज,१८ सप्टेंबरला ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार बनत आहे.जम्मू काश्मीरमध्ये ३ टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत.यातील पहिला टप्पा आजपासून सुरु झाला असून यात ७ जिल्ह्यांच्या २४ विधानसभा जागांवर निवडणुका होत आहेत.यात एकूण २१९ उमेदवार रिंगणात आहेत.मतदानासाठी ३ हजार २७६ पोलिंग स्टेशन बनवण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत काश्मिरी पंडीतदेखील मतदान करण्यासाठी उतरले आहेत.३५ हजारहून अधिक विस्थापित काश्मीरी पंडिंतांनी मतदानासाठी नोंदणी केली आहे.ईव्हीएमच्या माध्यमातून व्यक्तिगत रुपात मतदानाचा पर्याय निवडणाऱ्या प्रवासी काश्मीरी मतदारांना २४ मतदान केंद्रात ही सुविधा मिळेल. निवडणूक शांततापूर्ण पार पाडावी; यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.२३ लाखांहून अधिक पात्र मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.९० अपक्ष उमेदवारांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
- Advertisement -

