- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज,बुधवार १ एप्रिल रोजी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.विशेष म्हणजे,घेण्यात आलेल्या निर्णयात तब्बल बारा वर्षानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- मंत्रिमंडळ निर्णय👇
१.सामाजिक न्याय विभाग : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन,अर्जाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती.
२.महसूल विभाग : भूमि अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद,हे पद पदोन्नती व विभागीय भरतीद्वारे भरता येणार. राज्यातील भूकरमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
३.दिव्यांग कल्याण विभाग : राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ. आठवी ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना मोठा दिलासा.बारा वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ.
४.पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग : महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन. राज्यातील ५४ नदी प्रदुषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार.
५.जलसंपदा विभाग : अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १ हजार २३४ कोटी रुपयांच्या तरतूदीस मान्यता.सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार,९ हजार ६०० हेक्टर सिंचन क्षेत्राला मिळणार सुविधा .
६.महसूल,नोंदणी व मुद्रांक शुल्क,विभाग :
अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी मौजा- नवसारी येथील १६,७०८ चौ.मी.जागा.
- Advertisement -

