Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअवकाळी पावसाचा धोका कायम; आज अनेक जिल्ह्यांना अलर्ट..

अवकाळी पावसाचा धोका कायम; आज अनेक जिल्ह्यांना अलर्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा खेळ सुरू आहे.अश्यातच आज,गुरुवार २ एप्रिल रोजी अवकाळीचा धोका कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या काळात वीज पडणे,जोरदार वारे आणि गारपिटीमुळे शेती,फळबागा आणि पशुधनाला नुकसान होऊ शकते.त्यामुळे शेतकरी बांधवांसह नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार,आज गुरुवारी विदर्भातील वर्धा,गोंदिया,नागपूर,गडचिरोली,चंद्रपूर, भंडारा,यवतमाळ,बुलढाणा,अकोला,अमरावती,आणि वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,जालना,आणि बीडला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तसेच परभणी,हिंगोली, नांदेड,लातूर आणि धाराशीवाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव,धुळे,नंदुरबार आणि अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.सांगली,सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून येथे मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर,कोकण विभागातील मुंबई,सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.ठाणे,रायगड आणि रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!