- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-एखाद्या महिलेला कुणी एखाद्याने बॅड टच केलं तर त्या महिलेला पटकन लक्षात येत असते व तिच्याकडून नकारात्मक भूमिका घेतली जाते.मात्र, काहीजण जेव्हा एखादी महिला ‘नो’ म्हणजेच नाही म्हणाली तरीही जोर जबरजस्ती करून तिच्या शरीरावर,मनावर आणि गोपनीयतेवर हल्ला चढवीत असतात.त्यामुळे जेव्हा एखादी महिला ‘नो’ म्हणते तेव्हा त्याचा अर्थ ‘नाही’ असा होतो आणि तिच्या मागील लैंगिक कृतींच्या आधारे संमती गृहीत धरता येत नाही.असे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती एम.डब्ल्यू.चांदवानी यांच्या खंडपीठाने निकालात म्हटले व सामूहिक बलात्कार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने तीन पुरूषांची शिक्षा कायम ठेवली आहे.न्यायालयाने तिघांची शिक्षा रद्द करण्यास नकार दिला,परंतु त्यांची शिक्षा जन्मठेपेवरून २० वर्षांपर्यंत कमी केली.पीडितेच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा आरोपीचा प्रयत्न स्वीकारण्यास खंडपीठाने नकार दिला. न्यायालयाने म्हटले आहे की महिलेच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवणे हा तिच्या शरीरावर, मनावर आणि गोपनीयतेवर हल्ला आहे. न्यायालयाने बलात्काराला नैतिक आणि शारीरिकदृष्ट्या समाजातील सर्वात निंदनीय गुन्हा म्हणून वर्णन केले आहे.उच्च न्यायालयाने म्हटले आहे की,जर एखादी महिला नाही म्हणते तर त्याचा अर्थ ‘नाही’ असा होतो.यात कोणतीही अस्पष्टता नाही आणि महिलेच्या कथित अनैतिक कृतींच्या आधारे संमती गृहीत धरता येत नाही.
- Advertisement -