Wednesday, May 14, 2025
Homeमुंबईजेव्हा एखादी महिला 'नो' म्हणाली तर संमती गृहीत धरता येणार नाही- उच्च...
spot_img

जेव्हा एखादी महिला ‘नो’ म्हणाली तर संमती गृहीत धरता येणार नाही- उच्च न्यायालय -सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन पुरूषांची शिक्षा कायम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-एखाद्या महिलेला कुणी एखाद्याने बॅड टच केलं तर त्या महिलेला पटकन लक्षात येत असते व तिच्याकडून नकारात्मक भूमिका घेतली जाते.मात्र, काहीजण जेव्हा एखादी महिला ‘नो’ म्हणजेच नाही म्हणाली तरीही जोर जबरजस्ती करून तिच्या शरीरावर,मनावर आणि गोपनीयतेवर हल्ला चढवीत असतात.त्यामुळे जेव्हा एखादी महिला ‘नो’ म्हणते तेव्हा त्याचा अर्थ ‘नाही’ असा होतो आणि तिच्या मागील लैंगिक कृतींच्या आधारे संमती गृहीत धरता येत नाही.असे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती एम.डब्ल्यू.चांदवानी यांच्या खंडपीठाने निकालात म्हटले व सामूहिक बलात्कार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने तीन पुरूषांची शिक्षा कायम ठेवली आहे.न्यायालयाने तिघांची शिक्षा रद्द करण्यास नकार दिला,परंतु त्यांची शिक्षा जन्मठेपेवरून २० वर्षांपर्यंत कमी केली.पीडितेच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा आरोपीचा प्रयत्न स्वीकारण्यास खंडपीठाने नकार  दिला. न्यायालयाने म्हटले आहे की महिलेच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवणे हा तिच्या शरीरावर, मनावर आणि गोपनीयतेवर हल्ला आहे. न्यायालयाने बलात्काराला नैतिक आणि शारीरिकदृष्ट्या समाजातील सर्वात निंदनीय गुन्हा म्हणून वर्णन केले आहे.उच्च न्यायालयाने म्हटले आहे की,जर एखादी महिला नाही म्हणते तर त्याचा अर्थ ‘नाही’ असा होतो.यात कोणतीही अस्पष्टता नाही आणि महिलेच्या कथित अनैतिक कृतींच्या आधारे संमती गृहीत धरता येत नाही.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाला फेक खेळाडू नीरज चोप्राची भारतीय सैन्य दलाच्या लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्ती..

उद्रेक न्युज वृत्त :-आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदक,सिल्व्हर पदक तसेच देशतांर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रीडा जगतात विविध पदक विजेता भाला फेक खेळाडू नीरज चोप्राची आज,बुधवार...

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; आता बळींची संख्या झाली सहा..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांचे हल्ले वाढू लागलेत.अवघ्या पाच दिवसांत वाघांच्या हल्ल्यात सहा महिलांचा मृत्यू झाला आहे.शनिवार १० मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथे...

चक्क पोलिसांनीच पकडले पोलिसाला..!

उद्रेक न्युज वृत्त :-आपण अनेकदा चोर पोलीस खेळ खेळला असेल,काहींनी नसेलही खेळला.पण आम्ही लहानपणी ऐकले की,पोलीस हे चोरांना पकडत असतात.मात्र,एका प्रकरणात चक्क पोलिसांनीच पोलिसाला पकडण्याची...

अखेर आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नांना यश.. आता घरकुल धारकांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार ऑफलाईन पद्धतीने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-घरकुल धारकांसाठी आनंदाची बातमी असून उद्यापासून म्हणजेच गुरुवार १५ मे पासून गडचिरोली जिल्ह्यातील घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना पाच ब्रास मोफत वाळू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!