Wednesday, April 15, 2026
Homeमुंबईसावधान..! अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ बनावट..

सावधान..! अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ बनावट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.या संकेतस्थळाची माहिती अद्याप शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली नाही.अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी व्हावी,यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून येत्या १९ मे रोजी संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे.अशातच आता अकरावी प्रवेशाच्या नावाने बनावट प्रवेशाची संख्येतस्थळ निदर्शनास येऊ लागली आहे.दहावीचा निकाल जाहीर झाला नसला तरी लाखो विद्यार्थी या संकेतस्थळाला भेट देऊन अकरावी प्रवेशासंदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.यातून विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊन त्यांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यामुळे शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात निर्णय घेवून अशा संकेतस्थळावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.मुंबई,पुणे-पिंपरी चिंचवड,नागपूर,नाशिक,अमरावती आणि छत्रपती संभाजी नगर या सहा महानगरपालिका क्षेत्रामधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती.आता सर्वच राज्यात प्रवेश ऑनलाइन होणार असल्याने दहावीच्या परीक्षेला बसलेले जवळपास १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यासाठी बनावट संकेतस्थळाला भेट देण्याची शक्यता आहे.त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!