Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तछातीत जळजळ; वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला…-ॲसिडिटी सोबतच असू शकतो हृदयविकारही…

छातीत जळजळ; वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला…-ॲसिडिटी सोबतच असू शकतो हृदयविकारही…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- अलीकडे जेवणानंतर छातीत जळजळ होण्याची तक्रार उ‌द्भवत असते.अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.याचे कारण ॲसिडिटी असू शकते.परंतु प्रत्येक वेळी ॲसिडिटी असेल असेही नाही.अनेकदा हा हृदयविकारही असू शकतो. त्यामुळे या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. काही त्रास वाटत असेल तर घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ला घेत उपचार करणे आवश्यक आहे. तसेच व्यायामासोबतच वेळेवर जेवण, पुरेशी झोप घेतल्यास त्रास कमी होतो.

छातीत जळजळ होत असेल तर ॲसिडिटी सोबतच हृदयविकाराची लक्षणे असू शकते.प्रत्येक वेळी ॲसिडिटी असेल असे नसते.पोट आणि अन्ननलिका यातील व्हॉल्व्ह लीक झाल्यावर जळजळ होते.

ॲसिडिटीची कारणे👇

अवेळी जेवण,व्यायाम नसणे,वजन वाढत जाणे,पुरेशी झोप नसणे,तेलकट पदार्थ खाणे ही मुख्य कारणे आहेत. वेदनाशक गोळ्या खाणे,स्टेराइड घेणे हे देखील कारण असू शकते.

काय काळजी घ्याल?👇

जेवण वेळेवर करावे,व्यायाम करावा,वजनावर नियंत्रण ठेवावे.हॉटेलमधील मसालेदार पदार्थ टाळावेत.स्पायसी व जंक फूड खाणे टाळावे.वेळेवर झोप घ्यावी तसेच तणाव कमी करणे आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!