Monday, December 15, 2025
Homeहिंगोलीचोर मठात शिरले,अंगठ्या चोरल्या; देवघरावर नजर पडताच म्हणाले...नको !

चोर मठात शिरले,अंगठ्या चोरल्या; देवघरावर नजर पडताच म्हणाले…नको !

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

हिंगोली :- शहरातील खटकाळी भागामध्ये खडेश्वरबाबा यांचा मठ आहे.या ठिकाणी महंत सुमेरपुरी महाराज मठाचे सर्व कामकाज पाहतात.नेहमीप्रमाणे सुमेरपुरी महाराज आरती व धार्मिक कार्यक्रम करून रात्री मठामध्ये असलेल्या खोलीत आराम करण्यासाठी गेले होते.रात्री अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तीन चोरटे मठाच्या पाठीमागील भागातून आत आले.
मठात कोणीतरी आले आहे हे लक्षात घेऊन महंत सुमेरपुरी महाराज यांनी त्या तिघांना विचारणा केली.मात्र यावेळी त्यापैकी एकाने खंजीर काढून सुमेरपुरी महाराज यांना खोलीत घेऊन चलण्याबाबत दम दिला.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ते घाबरून गेले.चोरट्यांनी त्यांना धरून खोलीमध्ये नेले.यावेळी अन्य एका चोरट्याने त्यांच्या कानपट्टीवर पिस्तूल रोखून अलमारीची चावी मागितली. त्यांनी चावी देताच चोरट्यांनी अलमारी उघडून कपाटातील सोन्याच्या तीन ते चार अंगठ्या ताब्यात घेतल्या.यावेळी महंतांना मारहाण देखील केली.
खोलीतून निघालेल्या चोरट्यांचे खडेश्वर महाराजांच्या मूर्तीवरील चांदीच्या मुकुटाकडे लक्ष गेले.मात्र देवाचा मुकुट ‘नको’ असे एका चोरट्याने इतर दोघांना सांगितले.त्यानंतर तिघेही मुकुट न घेताच निघून गेले.मात्र जाताना चोरट्यांनी एकाजवळ असलेला मोबाईल देखील नेला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!