- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील १४ अशी गावे आहेत की,गेल्या अनेक दशकांपासून प्रशासकीय अडचणीत आहेत.येथील रहिवासी महाराष्ट्र आणि तेलंगणा दोन्ही निवडणुकांमध्ये मतदान करतात आणि दोन्ही राज्यांकडून नागरी सेवा घेतात.या गावांमध्ये दोन ग्रामपंचायती,दोन शाळा,दोन पाण्याच्या टाक्या आणि दोन निवडून आलेले प्रतिनिधी आहेत,असे आमदार भोंगळे म्हणाले.लोकसंख्या पूर्णपणे मराठी भाषिक आहे आणि सर्व दैनंदिन व्यवहार देखील मराठीत होतात.ही गावे महाराष्ट्राच्या महसूल हद्दीत येत असली तरी,तेलंगणाचे त्यापैकी अनेकांवर प्रशासकीय नियंत्रण आहे.महाराष्ट्राने येथे रस्ते,शाळा आणि पाणीपुरवठा योजना बांधल्या आहेत,तर तेलंगणा वीज पुरवते.अश्यातच सीमावर्ती परिस्थितीमुळे असंख्य प्रशासकीय आणि सामाजिक गुंतागुंत निर्माण झालेले होती.येथील बहुतेक नागरिकांकडे महाराष्ट्र आणि तेलंगणाचे दुहेरी निवडणूक कार्डच नव्हते तर रेशन आणि आरोग्य कार्ड देखील आहेत.वीजवाहिन्या देखील दोन्ही राज्यांमधील वीज संस्थांकडून टाकल्या गेल्या आहेत.तसेच,गावांमध्ये दोन सरपंच आणि ग्रामपंचायती आहेत,जे विभाजित प्रशासकीय रचनेचे प्रतिनिधित्व करतात.शिक्षण दोन भाषांमध्ये दिले जाते.यात मराठी आणि तेलुगू,प्रत्येक भाषिक गटासाठी स्वतंत्र शाळा आहेत.त्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या आंतरराज्यीय सीमा समस्येचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य अधिकाऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तहसील अंतर्गत येणाऱ्या अंतापूर,पद्मावती, इंदिरानगर,पळसागुडा,येसापूर,भेलापथर,लेंडीगुडा, येसापूर (नारायणगुडा),शंकरलोधी,महाराजगुडा, कोठा (बीके),परमडोली,मुकादमगुडा आणि लेंडीजला या
१४ वादग्रस्त गावांना ज्यावर सध्या महाराष्ट्र आणि तेलंगणा दोन्ही राज्यांचा दावा आहे,अश्यांना राज्याच्या अधिकार क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.मुंबईतील राज्य विधिमंडळ संकुलात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत निर्देश जारी करण्यात आले आहे.या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,राजुराचे आमदार देवराज भोंगळे,चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा आणि बाधित गावांचे रहिवासी उपस्थित होते.प्रसंगी अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे,ज्यामुळे ग्रामस्थांना दीर्घकाळापासून दिलासा मिळेल,असे राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.
- Advertisement -

