Friday, November 7, 2025
Homeगडचिरोलीगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विम्याची रक्कम न भरता शेतकऱ्यांना...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विम्याची रक्कम न भरता शेतकऱ्यांना २ लाखाची मदत- जिल्ह्यातील २४ जणांना लाभ मंजूर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- काहीवेळा शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वकारावे लागते.अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठीच सदर योजना काढली गेली होती. जेणेकरून गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल.नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्य शासन चालविणार असल्याचे घोषित केले होते.खाजगी विमा कंपन्यांकडून होणारा नाहक त्रास कमी करण्यासाठी शासनाने ही घोषणा केली. या नंतर लगेच जिल्हयातील प्रलंबित २४ जणांचे प्रस्ताव कृष‍ि आयुक्तालयाकडून मंजूरही झाले.

शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो.त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात.जसे कि अंगावर वीज पडून मृत्यू येणे,नैसर्गिक आपत्ती,पूर,सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात,रस्त्यावरील अपघात,विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो.त्यामुळे या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता,महाराष्ट्र सरकारने हि योजना सुरु केली तेव्हा त्याचे नाव ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ असे होते ते बदलून ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजना’ असे करण्यात आले. २००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता परंतु ह्या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली.जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर या कारणास्तव त्याला २ लाख एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जाईल.शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागले, तर त्याला २ लाख एवढा विमा देण्यात येईल.शेतकऱ्याचा अपघातामध्ये एक डोळा व एक अवयव निकामी झाला असेल, तर त्या शेकऱ्याच्या कुटुंबाला २ लाख  रक्कम विमाच्या स्वरूपात दिली जाणार आहे.अपघातामध्ये शेतकऱ्याचा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल,तर त्याला १ लाख विमा दिला जाईल. महाराष्ट्रतील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई,वडिल,लाभार्थी चे पती/पत्नी,मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकुण दोन जणांना लाभ घेता येईल.

या सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका अथवा जिल्हा कृषी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!