Wednesday, April 23, 2025
Homeगडचिरोलीगोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा शक्ती स्थापना व समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न... -सध्याची जनसुनावणी...
spot_img

गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा शक्ती स्थापना व समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न… -सध्याची जनसुनावणी ही लोकशाहीला हरताळ फासणारी -प्रा.अनिल होळी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
विशेष प्रतिनिधी/प्रियंका ठाकरे
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील
गहूबोडी येथे काल,रविवार २३ मार्चला ‘गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा’ स्थापना आणि समाजप्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.अनिल होळी यांनी आदिवासी समाजातील एकात्मतेच्या अभावावर आणि सरकारच्या धोरणांवर ठामपणे भूमिका मांडली.
मार्गदर्शनात प्रा.अनिल होळी म्हणाले की, “गोंडी संस्कृती व इतिहास हे जगातील प्राचीनतम संस्कृतींपैकी एक असूनही आजही गोंड समाज एकत्रित येऊ शकलेला नाही,ही चिंतेची बाब आहे. आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी सजग होण्याची आवश्यकता आहे.” यावेळी त्यांनी सुरजागड खाण प्रकल्प संदर्भात होणाऱ्या आदिवासींच्या शोषणाचा मुद्दा उचलून धरत सरकारवर जोरदार टीका केली. “जनसुनावणी म्हणजे जनतेच्या उपस्थितीत त्यांच्या मतांचा विचार करून निर्णय घेणे,मात्र सध्याची जनसुनावणी ही लोकशाहीला हरताळ फासणारी असून चार भिंतींच्या आत,लोकांचा आवाज न ऐकता घेतली जात आहे,” असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, “सरकार लोह प्रकल्पांची अंमलबजावणी जनतेच्या विरोधात करत आहे.आदिवासी समाजाच्या हक्कांवर अतिक्रमण होत आहे.जनतेच्या भूमीवर प्रकल्प लादले जात आहेत,हे अत्यंत चिंताजनक आहे.” या कार्यक्रमाद्वारे गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा स्थापन करून समाजाला धार्मिक,सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या एकत्र आणण्याचा संकल्प करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.योगेश सोयाम वैद्यकीय अधिकारी अमिर्झा,उद्घाटक रमेश कुमरे ( चंद्रपूर),कार्यक्रमाचे सह उद्घाटक कुंदन कोडापे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.एन.डी.पेंदाम (अहेरी), चव्हाण,राजू परचाके,अशोक कुळमेथे,घुमक जगन वेलके सह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर आज यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; शक्ती दुबे देशात पहिली..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजेच यूपीएससी.परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थी जीवाचे रान करून नशीब अजमावू पाहतात.यंदाच्या यूपीएससी...

पर्यटकांना नाव आणि धर्म विचारत दहशतवाद्यांचा अंधाधुंद गोळीबार; २० जणांचा मृत्यू झाल्याची भीती..

उद्रेक न्युज वृत्त :-जम्मू-काश्मीरच्या पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ बैसरन व्हॅली येथे आज,मंगळवारी २२ एप्रिलला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बैसरन मैदानावर ...

आता चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवे सिईओ पुलकित सिंग तर विवेक जॉन्सन बीडचे जिल्हाधिकारी.. – राज्यातील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील बदल्यांचे सत्र संपता-संपेना..! राज्य सरकारकडून आतापर्यंत अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या(IAS) बदल्या करण्यात आल्या आहेत.अशातच आज,मंगळवार २२ एप्रिलला राज्यातील पाच आयएएस...

मित्राला सोडून देण्यासाठी देसाईगंजला गेलेल्या ब्रम्हपुरीच्या तरुणाची वैनगंगा नदीत उडी…

उद्रेक न्युज  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरात वास्तव्यास असणारा २२ वर्षीय तरुण मित्राला सोडून देण्यासाठी दुचाकीने देसाईगंजला(वडसा)गेला.मात्र,परतीच्या वाटेवर असणाऱ्या देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीत उडी घेऊन जीवनयात्रा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!