Tuesday, July 7, 2026
Homeनागपूरकार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत अनेकांना माहिती नसल्याने ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणली जाते.पण,काही सुजाण नागरिक जिल्हा ग्राहक आयोगाचा आधार घेत दुकानदार,व्यवसायिक,कंपन्या व इतरांकडून होणारी पिळवणूक टाळून धडा शिकवत असतात.अश्याच प्रकारे एका आलिशान कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या जनरल इन्शुरन्स कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका देत तक्रारदार ग्राहकाला ३० लाख १३ हजार रुपये ९ टक्के व्याजासह अदा करा आणि शारीरिक-मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी एकूण ३० हजार रुपये नुकसानभरपाई द्या,असे आदेश कंपनीला दिले आहेत.
मनीष अग्रवाल असे विमाधारक ग्राहकाचे नाव असून त्यांच्या कारचा नागपूर येथे २५ जानेवारी २०२१ रोजी अपघात झाला.त्यानंतर,अधिकृत डिलरने कारची तपासणी केली आणि दुरुस्तीसाठी ४१ लाख ५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले.परंतु,विमा कंपनीने अग्रवाल यांनी तथ्य लपवले आणि खोटी माहिती दिली,असा ठपका ठेवत कारचा विमा दावा फेटाळून लावला.परिणामी,अग्रवाल यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे दार ठोठावले.आयोगाने दोन्ही बाजूंचे पुरावे तपासले असता,विमा कंपनीच्या तपास अहवालात ग्राहकाविरुद्ध कोणताही ठोस पुरावा आढळून आलेला नाही.तसेच कंपनीने दावा नाकारला, पण करण्यात आलेले आरोप तथ्यहीन असल्याने आयोगाने ग्राहकाच्या बाजूने निर्णय दिला व ग्राहकास नुकसाभरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश विमा कंपनीला दिले.विशेष म्हणजे,ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असतो. दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही,तर जेलची हवा खावी लागते.असाच प्रकार यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात मागील वर्षात घडलेला होता.ग्राहक आयोगाच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी एका पतसंस्थेच्या अध्यक्षाला दोन वर्षे कारावास आणि दंडाची शिक्षा यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष तथा प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकारी डॉ.रवींद्र उल्हास मराठे यांनी मंगळवार १६ डिसेंबर २०२५ रोजी निर्णय दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!