Wednesday, July 15, 2026
Homeनागपूरकर्जमाफीतून वंचित राहिलेल्या २४८ शेतकऱ्यांना न्यायालयाचा दिलासा.. - तीन महिन्यांत कर्जमाफी देण्याचे...

कर्जमाफीतून वंचित राहिलेल्या २४८ शेतकऱ्यांना न्यायालयाचा दिलासा.. – तीन महिन्यांत कर्जमाफी देण्याचे सरकारला आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कर्जमाफीतून वंचित राहिलेल्या २४८ शेतकऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा देत सरकारला चांगलेच फटकारले.येत्या तीन महिन्यांत २४८ शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर ‘कंटेंम्प्ट टू कोर्ट’ करण्याचाही इशारा न्यायालयाने दिला आहे.
याबाबत प्रकरण असे की,राज्य सरकारने सन २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती.त्यावेळेस अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील अडगाव बूजरूक येथील २४८ शेतकऱ्यांना तत्कालीन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटलांच्या उपस्थितीत अकोल्यात झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात सरकारने कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली होती.यानंतरही प्रत्यक्षात २०१७ पासून या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नव्हती. शासनाकडून सातत्याने पोर्टल समस्या,तांत्रिक अडचणी अशी कारणे दिली जात होती.त्यामुळे शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाने शासनाने दिलेली कारणे फेटाळून लावत सरकारची चांगलीच कानउघडणी केली आणि शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या,असा ठोस आदेश राज्य सरकारला दिला.येत्या २२ डिसेंबर २०२५ पर्यंत आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली नाही,तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कोर्ट अवमानना प्रकरणी कारवाई करण्यात येईल,असाही इशारा दिला आहे.त्यामुळे तब्बल २४८ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!