Wednesday, June 24, 2026
Homeएटापल्लीएटापल्लीत दोन वर्षांत घरभाड्याचे दर चार पटीने वाढले…

एटापल्लीत दोन वर्षांत घरभाड्याचे दर चार पटीने वाढले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

एटापल्ली(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लोहखनिजाच्या प्रकल्पात काम करणारे शेकडो कर्मचारी एटापल्ली येथे भाड्याने राहत असल्याने मागील दोन वर्षांत घरभाड्याचे दर चार पटीने वाढले आहेत तर अनेकांना घर भाड्याने मिळणे कठीण झाले आहे.

एटापल्ली हा नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त तालुका आहे. त्यामुळे तालुक्यात कार्यरत असलेले कर्मचारी याच ठिकाणी राहून नोकरीच्या ठिकाणी ये-जा करतात.या कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन काही नागरिकांनी घरे बांधली व ते भाड्याने देत होते.साधारणपणे तीन ते चार हजार रुपये भाडे आकारले जात होते; मात्र हेडरी येथे लोहखनिजाचे उत्खनन करण्याच्या कामाला सुरुवात झाल्यापासून या ठिकाणी काम करणाऱ्या बाहेर राज्यातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे.या कर्मचाऱ्यांना ठेवण्यासाठी कंपनी घरमालक म्हणेलतेवढे भाडे देण्यास तयार होत आहे. जी खोली पूर्वी तीन ते चार हजार रुपयांना मिळत होती.आता त्याचे भाडे १२ हजार रुपयांच्यावर पोहोचले आहे.त्यामुळे याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!