Friday, November 7, 2025
Homeगडचिरोलीआपसी तडजोड प्रकरणी ११ फेब्रुवारी ला लोक अदालतीचे आयोजन...- वेळ,श्रम व पैस्यांची...

आपसी तडजोड प्रकरणी ११ फेब्रुवारी ला लोक अदालतीचे आयोजन…- वेळ,श्रम व पैस्यांची बचत करण्याकरिता लोक अदालत….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी.शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्यावतीने ११ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली व तालुका न्यायालय अहेरी,आरमोरी,चामोर्शी,देसाईगंज,धानोरा, कुरखेडा व सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे,दिवाणी दावे असे प्रलंबित वाद तसेच वाद दखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.यासाठी पक्षकार,अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालती मध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत;असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे अध्यक्ष,सचिव व सर्व सदस्य यांनी केले आहे. 

राष्ट्रीय लोक अदालती मध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे १३८ एन.आय.प्रकरणे,भु-संपादन प्रकरणे,कौटुंबिक प्रकरणे,मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे,दरखास्त प्रकरणे,बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन,मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे,पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे,नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. 

लोकन्यायालयात पारीत झालेल्या प्रकरणांची न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करता येते.लोकन्यायालयात तडजोड केल्याने लोकांचा वेळ,श्रम व पैसा यांची बचत होते.दोन्ही पक्षकारांमध्ये असलेले वैरत्व नष्ट होऊन गोडवा v  चांगले संबंध निर्माण होतात.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई मार्फत संपुर्ण राज्यात ११ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे.तरी सर्वांनी  ११ फेब्रुवारी २०२३ रोजी होणा-या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन तडजोड करून सामंजस्य निर्माण करून सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव आर.आर.पाटील यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!