Sunday, May 17, 2026
Homeगडचिरोलीआपसी तडजोड प्रकरणी ११ फेब्रुवारी ला लोक अदालतीचे आयोजन...- वेळ,श्रम व पैस्यांची...

आपसी तडजोड प्रकरणी ११ फेब्रुवारी ला लोक अदालतीचे आयोजन…- वेळ,श्रम व पैस्यांची बचत करण्याकरिता लोक अदालत….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी.शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्यावतीने ११ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली व तालुका न्यायालय अहेरी,आरमोरी,चामोर्शी,देसाईगंज,धानोरा, कुरखेडा व सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे,दिवाणी दावे असे प्रलंबित वाद तसेच वाद दखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.यासाठी पक्षकार,अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालती मध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत;असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे अध्यक्ष,सचिव व सर्व सदस्य यांनी केले आहे. 

राष्ट्रीय लोक अदालती मध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे १३८ एन.आय.प्रकरणे,भु-संपादन प्रकरणे,कौटुंबिक प्रकरणे,मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे,दरखास्त प्रकरणे,बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन,मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे,पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे,नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. 

लोकन्यायालयात पारीत झालेल्या प्रकरणांची न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करता येते.लोकन्यायालयात तडजोड केल्याने लोकांचा वेळ,श्रम व पैसा यांची बचत होते.दोन्ही पक्षकारांमध्ये असलेले वैरत्व नष्ट होऊन गोडवा v  चांगले संबंध निर्माण होतात.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई मार्फत संपुर्ण राज्यात ११ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे.तरी सर्वांनी  ११ फेब्रुवारी २०२३ रोजी होणा-या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन तडजोड करून सामंजस्य निर्माण करून सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव आर.आर.पाटील यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार...

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!