Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीआदळून-आदळून स्वागत करायचेय; तर मग चला गडचिरोली...!

आदळून-आदळून स्वागत करायचेय; तर मग चला गडचिरोली…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- एवढ्या फास्ट आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण कधी ऐकले नसेल असे स्वागत गडचिरोली जिल्ह्याच्या सुरुवातीलाच मोठ्या उत्साहात,आनंदात व जोमाने आदळून-आपटून केले जाते.यासाठी हातात हार लागत; ना कुणाची वाट पाहावी लागत.बस्स फक्त एखादे वाहन पाहिजे. दुचाकी असो की चारचाकी वाहन असो.

स्वागत करणारी सध्या स्थितीतील खरी घटना असून देसाईगंज-आरमोरी मार्गे गडचिरोली जात असतांना कुठल्याही प्रकारचे स्वागत केले जात नाही.मात्र गडचिरोली जवळील कठानी नदीवरील पुलाजवळून गेल्यास स्वागत नक्कीच केला जातो आहे.

स्वागत कसे केले जाते जाणून घेऊया; काल ११ फेब्रुवारी २०२३ रोजी दुचाकीने आरमोरी येथून गडचिरोली येथे प्रवास करतेवेळी कठानी नदी पुलावरून जात असतांना मुख्य डांबरीकरण रस्ता एवढा खराब झाला की दुचाकी वाहन,चारचाकी वाहन व महामंडळाची बस सुद्धा आदळत-आपटत,धक्के खात जाऊन; विना माळ घेऊन स्वागत केले जात असल्या सारखे वाटत असूनही याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने याचे नवलच वाटते आहे.

कठानी नदी पुलाजवळून ५० ते १०० मीटर अंतरावरील डांबरीकरण रस्ता खड्डेमय होऊन पूर्णपणे फुटलेल्या अवस्थेत झाला आहे.जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या आगमनाच्या मुख्य मार्गावरच असे होत असेल तर बाकीच्या ठिकाणची अवस्था कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्हा स्तरावर बांधकाम विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस अधीक्षक कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय व इतर संपूर्ण क्लास वन अधिकाऱ्यांची कार्यालये असूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने यांनाही आदळून-आदळून स्वागत करण्याची सवय तर झाली नसावी ना? सर्वसामान्य जनता यांना तर सवयच झाली;असल्याने यावर तोडगा निघणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!