Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीआदळून-आदळून स्वागत करायचेय; तर मग चला गडचिरोली...!

आदळून-आदळून स्वागत करायचेय; तर मग चला गडचिरोली…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- एवढ्या फास्ट आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण कधी ऐकले नसेल असे स्वागत गडचिरोली जिल्ह्याच्या सुरुवातीलाच मोठ्या उत्साहात,आनंदात व जोमाने आदळून-आपटून केले जाते.यासाठी हातात हार लागत; ना कुणाची वाट पाहावी लागत.बस्स फक्त एखादे वाहन पाहिजे. दुचाकी असो की चारचाकी वाहन असो.

स्वागत करणारी सध्या स्थितीतील खरी घटना असून देसाईगंज-आरमोरी मार्गे गडचिरोली जात असतांना कुठल्याही प्रकारचे स्वागत केले जात नाही.मात्र गडचिरोली जवळील कठानी नदीवरील पुलाजवळून गेल्यास स्वागत नक्कीच केला जातो आहे.

स्वागत कसे केले जाते जाणून घेऊया; काल ११ फेब्रुवारी २०२३ रोजी दुचाकीने आरमोरी येथून गडचिरोली येथे प्रवास करतेवेळी कठानी नदी पुलावरून जात असतांना मुख्य डांबरीकरण रस्ता एवढा खराब झाला की दुचाकी वाहन,चारचाकी वाहन व महामंडळाची बस सुद्धा आदळत-आपटत,धक्के खात जाऊन; विना माळ घेऊन स्वागत केले जात असल्या सारखे वाटत असूनही याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने याचे नवलच वाटते आहे.

कठानी नदी पुलाजवळून ५० ते १०० मीटर अंतरावरील डांबरीकरण रस्ता खड्डेमय होऊन पूर्णपणे फुटलेल्या अवस्थेत झाला आहे.जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या आगमनाच्या मुख्य मार्गावरच असे होत असेल तर बाकीच्या ठिकाणची अवस्था कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्हा स्तरावर बांधकाम विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस अधीक्षक कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय व इतर संपूर्ण क्लास वन अधिकाऱ्यांची कार्यालये असूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने यांनाही आदळून-आदळून स्वागत करण्याची सवय तर झाली नसावी ना? सर्वसामान्य जनता यांना तर सवयच झाली;असल्याने यावर तोडगा निघणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!